शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

बांबू निष्कासनात गडचिरोलीतील ग्रामसभांनी वनविभागाला केले बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 13:21 IST

वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देपीसीसीएफचे निर्देशही कुचकामीग्रामसभा ना माहिती देत, ना मार्गदर्शन घेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या सामूहिक वनहक्काच्या पट्ट्यांमधील परिपक्व झालेला बांबू तोडून त्याची विक्री करण्यासाठी वनहक्क समित्यांना वन विभागाने मदत करावी, आणि किती बांबूची विक्री झाली याचा मासिक अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (एपीसीसीएफ) राज्यातील सर्व वनसंरक्षकांना दिले होते. पण प्रत्यक्षात ग्रामसभांकडून याबाबतची माहितीच वनविभागाला दिली जात नसल्यामुळे वनविभागही बांबू निष्कासनाबद्दलच्या पुरेपूर माहितीपासून अनभिज्ञ आहे. ग्रामसभांनी एक प्रकारे वनविभागाला बेदखल केल्याने जंगलाचा ऱ्हास तर होत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वनहक्क कायद्यांतर्गत राज्यभरातील आदिवासीबहुल गावांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण झाले आहे. या पट्ट्यांमधील वनोपज गोळा करण्याचे अधिकार संबंधित गावांना देण्यात आले आहेत. बांबू हा सुद्धा वनोपजामध्ये मोडत असल्याने बांबू तोडून त्याची विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना मिळाले आहेत. मात्र नेमका कोणता बांबू तोडावा, तो कसा तोडावा याबाबतचे तांत्रिक ज्ञान स्थानिक नागरिकांना नाही. चुकीच्या पद्धतीने तोडणी झाल्यास बांबूचे जंगल नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच अपरिपक्व बांबूला योग्य भाव व बाजारपेठ मिळत नसल्याचे वन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) यांनी ११ मार्च २०२० रोजी राज्यातील सर्व मुख्य वनसंरक्षक यांच्या नावाने पत्र निर्गमित करून ग्रामसभांना बांबू निष्कासनासाठी मदत करण्याचे निर्देश दिले.

बांबूचे जंगल प्रामुख्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातच असल्याने या दोन जिल्ह्यांसाठी सदर पत्र अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामसभांना वन विभागाने तांत्रिक मार्गदर्शन करून बांबू विक्रीस सहकार्य करावे, बांबू विक्रीतून गोळा झालेला पैसा संबंधित वनहक्क व्यवस्थापन समितीच्या खात्यामध्ये गोळा करावा, आणि त्याबाबतची माहिती प्रत्येक महिन्याला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) कार्यालयाकडे सादर करावी, असे त्या पत्रात नमूद आहे. मात्र गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे याबाबतची माहितीच उपलब्ध नाही. चालू वर्षातील माहिती तर सोडाच मागील वर्षीची माहितीसुद्धा उपलब्ध नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. ते तांत्रिक मार्गदर्शन घेत नसल्याने काही अपरिपक्व बांबूचीही कटाई होते. ग्रामसभांनी आमची मदत घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र ते मदत तर घेत नाहीच, पण वनविभागाने मागितलेली बांबू निष्कासनाची माहितीही देत नाही. ग्रामसभांनी वनपरिक्षेत्र स्तरावर समन्वय ठेवल्यास त्यांचा फायदा होण्यासोबत अनावश्यक जंगलाची कटाई थांबेल.- एस.व्ही.रामाराममुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डनforest departmentवनविभाग