शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर

By admin | Updated: September 7, 2016 02:15 IST

साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर : साकोली-वडसा-गडचिरोलीविलास चिलबुले आरमोरीसाकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग होणार अशी घोषणा करण्यात आली होती. या महामार्गाच्या कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या रस्ते विकास विभाग गडचिरोली व भंडारा यांच्याकडे याबाबत माहिती घेतली असता, एक ते दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार नसल्याचे समजते. वडसा-आरमोरीच्या मधोमध वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. महामार्गाच्या रस्त्यालगत शेतकरी, जमिनधारकांना, दुकानदारांना जमीन हस्तांतरण करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. जर प्रशासनाने महामार्गालगतच्या जमिनीची माहिती मागितली असली तरी या बाबीचे केवळ सर्वेक्षणच सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. अलिकडेच या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. या महामार्गाचे नूतनीकरण भंडारा व गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार आहेत. वडसा, आरमोरी, गडचिरोलीत होणार बायपासराष्ट्रीय महामार्ग म्हणून साकोली-वडसा-गडचिरोलीची घोषणा झाली आहे. या महामार्गावर येणाऱ्या वडसा, आरमोर, गडचिरोली या तिन्ही गावांमध्ये बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. आरमोरी येथे बायपास मार्ग शहराच्या बाहेरून करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. वडसा येथेही दोन ते तीन प्रकारच्या बायपासबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार यावर विचार केला जाणार आहे. गडचिरोलीला सुद्धा बायपास काढता येतो काय, याविषयी चाचपणी करण्यात येत आहे. बायपास मार्ग झाला नाही, तर शहरातून होणारा रस्ता हा ११० फुटाचाच ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १८० फुटाचा राहतो. मात्र घरांची पडझड होऊ नये यासाठी ही व्यवस्था करावी, असा लोकप्रतिनिधींचाही दबाव आहे. त्यातून हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. शहरामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असल्याची माहिती असून साधारणत: १५० वर्ष टिकेल, असा दावा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.