शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके आपत्तीग्रस्त घोषित ! शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:16 IST

शासनाकडून मिळणार विविध सवलती : पावसाळ्यात बसला विविध पिकांना अतिवृष्टीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील बाराही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. त्यातील १० तालुके पूर्णतः बाधित व दोन तालुके अंशतः बाधित घोषित केले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो. तसेच नद्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे पुराचा फटका शेतीला बसते. लाखो रुपये खर्चुन शेतात विविध पिकांची लागवड शेतकरी करतात. मात्र, पुरामुळे पीक नष्ट होते. अशावेळी सरकारी मदतीची आस शेतकरी लावून धरतात. संबंधित तालुक्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकार आपत्तीग्रस्त तालुके घोषित करीत असते. राज्य सरकारने राज्यातील २८२ तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले आहेत. त्यात गडचिरोली तालुक्यातील बाराही तालुक्यांचा समावेश आहे.

दोन तालुके अशंतः बाधित

चामोर्शी व कोरची हे दोन तालुके अशंतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही. ज्या मंडळात नुकसान भरपाई झाली, त्याच मंडळातील शेतकऱ्यांना किंवा इतरांना लाभ मिळेल. पूर्णतः बाधित म्हणून घोषित असलेल्या तालुक्यातील सर्वच नागरिकांना सवलतींचा लाभदिला जाईल.

अॅग्रीस्टॅक नोंद नसेल तर ई-केवायसी आवश्यक

ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी होऊन अॅग्रीस्टॅकमध्ये ई-केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माकडून मिळणार विविध सवलती, पावसाळ्यात बसला अतिवृष्टीचा फटकाहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळते. त्यांना ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीने ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

कर्ज वसुलीस स्थगिती

संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट दिली जाईल. सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती दिली जाईल. तिमाही वीज बिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाईल.

जमीन खरडलेल्या शेतकऱ्यांना तीन लाख

अतिवृष्टी व पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून गेल्या आहेत ती जमीन लागवडीयोग्य करण्यासाठी तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वितरण सुरू

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यातच नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा सुद्धा झाला आहे. दिवाळीपूर्वी संपूर्ण निधी वितरित करण्याचे निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहेत.

१० हजार नुकसान झालेल्यांना पीक विम्याचाही लाभ

रुपये रबी हंगामातील बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जातील. या शेतकऱ्यांना रबी हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli Declared Disaster-Hit; Farmers Get Relief After Heavy Rain

Web Summary : Gadchiroli's 12 talukas declared disaster-hit due to heavy rains, providing relief to farmers. Ten talukas are fully affected, two partially. Farmers will receive financial aid, loan restructuring, and land restoration support. Assistance distribution is underway before Diwali.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेतीCrop Insuranceपीक विमा