शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आदिवासींच्या आरोग्याचा अहवाल दिल्लीत धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

केंद्र शासनाचा आरोग्य विभाग व आदिवासी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बंग यांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती गठित केली होती. या समितीने साडेचार वर्ष आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला. ९ आॅगस्ट २०१८ रोजी हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला. दोन्ही विभागांनी या अहवालाचे स्वागत केले. तत्कालीन आरोग्य अधिकारी जे. पी. नड्डा यांनी या अहवालानुसार उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांची माहिती : साडेचार वर्ष अभ्यास करूनही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील ११ कोटी आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने ९ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र शासनाला अहवाल सादर केला. मात्र या अहवालानुसार उपाययोजना करण्यात आल्या नाही, अशी खंत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.केंद्र शासनाचा आरोग्य विभाग व आदिवासी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बंग यांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती गठित केली होती. या समितीने साडेचार वर्ष आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला. ९ आॅगस्ट २०१८ रोजी हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला. दोन्ही विभागांनी या अहवालाचे स्वागत केले. तत्कालीन आरोग्य अधिकारी जे. पी. नड्डा यांनी या अहवालानुसार उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अजुनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.आदिवासींच्या भागात आरोग्य व्यवस्था अतिशय खालच्या स्तराची असल्याचे वास्तव या अहवालात मांडण्यात आले आहे. शासनाकडून निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. आरोग्य सेवेत गुणवत्ता नाही. तसेच आरोग्य सेवा करण्याची प्रेरणासुद्धा नसल्याचे दिसून आले होते. या समितीने आदिवासींच्या आरोग्याच्या प्रमुख १० प्रश्नांवर उत्तरे मांडली आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणून आदिवासी आरोग्याचा राष्टÑीय कृती आराखडा तयार करण्याचे सूचविले आहे. प्रत्येक आदिवासी व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रतिवर्षी २ हजार ५०० रूपये व देशभरातील संपूर्ण आदिवासींच्या आरोग्यासाठी २७ हजार ५०० कोटी रूपये राज्य व केंद्र शासनाने मिळून खर्च करावेत, अशी शिफारस केली आहे. निती आयोगानेसुद्धा या अहवालावर आधारीत कृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अजुनपर्यंत या अहवालानुसार कार्यवाही झाली नसल्याने डॉ.बंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.केंद्र शासनाला लिहीले पत्रडॉ.अभय बंग यांनी या अहवालावर कृती करण्यासाठी केंद्र शासनाला पत्र लिहीले आहे. मागील दोन वर्षांमध्ये जवळपास १५ लाख आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला. कुपोषण, मलेरिया, निमोनिया, डायरिया, टीबी, सर्पदंश यासारखे आजार व अपघात आदिवासींचा जीव घेत आहेत. आरोग्याच्या सुविधा नसल्याने कोविड-१९ हा विषाणूसुद्धा आदिवासींमध्ये खूप कहर माजवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पत्राला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ.बंग यांच्या सूचनांप्रमाणे उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी कळविले.

टॅग्स :Abhay Bangअभय बंगHealthआरोग्य