सिरोंचा-आसरअल्ली मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:39+5:30
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था जैसे थे होते. संबंधित विभागाकडून थातुरमातूर दुरूस्ती होत असल्यामुळे अल्पावधीतच मार्गाची दुरवस्था होते. सिरोंचा शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही अशाच प्रकारे डागडुजी केली जाते. परंतु थातुरमातुर काम करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. सध्या अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

सिरोंचा-आसरअल्ली मार्ग खड्ड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने या मार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती केली जाते. परंतु पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था जैसे थे होते. संबंधित विभागाकडून थातुरमातूर दुरूस्ती होत असल्यामुळे अल्पावधीतच मार्गाची दुरवस्था होते. सिरोंचा शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही अशाच प्रकारे डागडुजी केली जाते. परंतु थातुरमातुर काम करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. सध्या अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.
परिसरातील वाहनधारक याच रस्त्याने तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. शिवाय सोमनूर संगमाकडे पर्यटक याच रस्त्याने ये-जा करीत असतात. या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पडून दुचाकीचे अनेक अपघात घडले आहेत. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा संबंधित विभाग रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे विस्तारल्याने सध्या आवागमनास प्रचंड त्रास होत आहे. दररोज घडणाºया किरकोळ अपघातांमुळे आसरअल्ली व पातागुडम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खड्डेमुक्त रस्त्याचे आश्वासन शासन देत असले तरी प्रत्यक्ष मात्र काम होत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था दीर्घकाळ कायम असते. भविष्यात या मार्गावर गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मार्गाची दुरूस्ती करून नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.