शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी ...

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले. माेर्चा वनसंरक्षक कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्याठिकाणी सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेला विजय खरवडे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू, असे आश्वासन विजय खरवडे यांनी दिले. तसेच भविष्यात माेठे आंदाेलन उभारले जाईल, असा इशारा वनविभागाला दिला. सभेनंतर मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले.

बाॅक्स ......

या आहेत प्रमुख मागण्या

अमिर्झा परिसरातील गावांमध्ये वाघांनी दहशत माजविली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघांचा बंदाेबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत द्यावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नाेकरी द्यावी. अकार्यक्षम वनाधिकारी व वनकर्मचारी यांची हकालपट्टी करावी. चुरचुरा बिटातील ४० एकर जागेवर अवैध वृक्षताेड करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. तलाठी व वनकर्मचाऱ्याची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी.