शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

‘ते’ खऱ्या अर्थाने ठरले जलदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:36 PM

कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो.

ठळक मुद्देआमगावचे सुपुत्र : सहा दशकांपूर्वी व्याकुळलेल्यांची भागविली होती तृष्णा

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो. परंतु या विज्ञान युगाला लाजवेल असे व्यक्तिमत्व देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे होऊन गेले. ते म्हणजे मनिराम ढोरे महाराज!आज ‘पाणी वाचवा, पाण्याचा जपून वापर करा’ असे अनेक संदेश देत पाणी बचतीचे लाख प्रयत्न होत आहेत. तरीही अवस्था बिकटच आहे. त्यात सहा-सात दशकांपूर्वी आमगावच्या मनिराम ढोरे महाराजांनी पाण्याचे महत्त्व ओळखून आपल्या दोन्ही खांद्यावर कावड घेऊन सावंगी तसेच भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर परिसरात लोकांची तृष्णा भागविण्याचे काम केले. यातून त्यांनी पाण्याची खरीखुरी आवश्यकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले. २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करताना मनिराम ढोरे महाराजांच्या कार्याचे स्मरण होते. पाण्यासाठी वाहिलेल्या त्यांच्या जीवन कार्यातून सकारात्मक प्रेरणा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.आमगाव येथे जन्मलेल्या मनिराम महाराजांची कर्मभूमी आमगाव, सावंगी आणि लाखांदूर परिसर राहिला. काम काय तर स्वत:च्या खांद्यावर कावड घ्यायची नि विहीर वा जलसाठ्यातील पाणी तहानलेल्यांना पाजायचे. मंगळवार हा दिवस मनिराम महाराजांसाठी जणू सणाचा दिवस असायचा. कारण या दिवशी लाखांदूरला आठवडी बाजार भरायचा आणि यानिमित्त आलेल्या हजारो लोकांना ते कावडीने वाहिलेल्या पाण्याने तृप्त करायचे. यामुळे त्यांना पंचक्रोशीत पाणीवाले मनिराम ढोरे महाराज म्हणून ओळख प्राप्त झाली होती, जी आजही कायम आहे. कार्य व कीर्तीने मनिराम महाराज खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत.सामाजिक कार्यांमध्येही महाराज अग्रणीमनिराम ढोरे महाराज केवळ वाटसरूंना पाणी पाजण्याचेच काम करीत नव्हते, तर फावल्या वेळेत गावांतील जनावरांना गवत-चारा टाकायचे. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचे. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून सावंगीवासीयांनी मनिराम महाराजांच्या मृत्यूनंतर गावात देसाईगंज-लाखांदूर मुख्यमार्गाच्या बाजूला समाधी बांधली. पाणी आणि मनिराम महाराजांचे नाव घट्ट विणले गेले आहे. हे येथील समाधीला भेटी देणाºया लोकांच्या भावनिकतेतून प्रदर्शित होते.

टॅग्स :Waterपाणी