शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुख्यमंत्रीपद आरक्षणातून नाही, तर कर्तृत्वातून मिळते; महिला मुख्यमंत्रीपदाच्या विषयाला सुप्रिया सुळेंची बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 18:42 IST

Gadchiroli News इतर राज्यात जिथे महिला मुख्यमंत्री झाल्या तिथे त्यांना आपल्या कर्तृत्वामुळेच ते पद मिळाले असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महिला मुख्यमंत्री’पदाच्या विषयाला बगल दिली.

गडचिरोली : पुरोगामी महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री लाभल्या नाही, कारण हे पद महिला किंवा कोणासाठीही आरक्षित ठेवले जात नाही. कर्तृत्वानुसार ते स्थान मिळत असते. इतरही राज्यात जिथे महिला मुख्यमंत्री झाल्या तिथे त्यांना आपल्या कर्तृत्वामुळेच ते पद मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदासाठी तोच निकष लागतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महिला मुख्यमंत्री’पदाच्या विषयाला बगल दिली.

दिव्यांगांना श्रवणयंत्र वाटप आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडून घाईघाईने मिळालेला डेटा परिपूर्ण नाही. त्यामुळे त्यात ओबीसी समाजाचे नुकसान होईल, पण महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आरक्षणास उशीर लागत असला, तरी ते व्यापक असेल असा दावा त्यांनी केला.भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी मो. पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पडसादावर बोलताना त्या म्हणाल्या की, हे सर्व फार दुर्दैवी आहे. पूर्वीची राजकीय मंडळी कधी लक्ष्मणरेषा पार करत नव्हते. विदेश नितीवर भारताबाहेर जबाबदारीने बोलत होते. ते कधीही चौकटीबाहेर जात नव्हते. पण आता कोणी काय बोलते यावर नियंत्रण नसते.

पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, राज्य महिला आरोगाच्या सदस्य आभा पांडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सुरेखा ठाकरे, शाहीन हकीम, ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सलील देशमुख, वर्षा श्यामकुळे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अडकलेल्या प्रकल्पांसाठी गडकरी, यादवांशी बोलणारगडचिरोली जिल्ह्यातील अनेक विकासकामांसाठी वनकायद्याचा अडसर येत आहे. केंद्र सरकारकडे त्याबाबतचे प्रस्ताव पडले आहेत. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वने व पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी बोलेन. ते या कामात नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

पर्यावरणाचे मूल्यमापन पारदर्शकपणे करावेगडचिरोली जिल्ह्यातील लोह किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा किंवा इतर कोणत्याही खाणी असो, त्यांचे पारदर्शकपणे पर्यावरणविषयक मूल्यमापन केले पाहिजे. देशात खाणींमधून दीड लाख कोटी रुपयांचा महसूल येईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण प्रत्यक्षात १३ हजार कोटीच आले. त्याचा हिशेब त्यांनी द्यावा, असेही एका प्रश्नावर बोलताना खा.सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे