शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मुख्यमंत्रीपद आरक्षणातून नाही, तर कर्तृत्वातून मिळते; महिला मुख्यमंत्रीपदाच्या विषयाला सुप्रिया सुळेंची बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 18:42 IST

Gadchiroli News इतर राज्यात जिथे महिला मुख्यमंत्री झाल्या तिथे त्यांना आपल्या कर्तृत्वामुळेच ते पद मिळाले असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महिला मुख्यमंत्री’पदाच्या विषयाला बगल दिली.

गडचिरोली : पुरोगामी महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री लाभल्या नाही, कारण हे पद महिला किंवा कोणासाठीही आरक्षित ठेवले जात नाही. कर्तृत्वानुसार ते स्थान मिळत असते. इतरही राज्यात जिथे महिला मुख्यमंत्री झाल्या तिथे त्यांना आपल्या कर्तृत्वामुळेच ते पद मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदासाठी तोच निकष लागतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महिला मुख्यमंत्री’पदाच्या विषयाला बगल दिली.

दिव्यांगांना श्रवणयंत्र वाटप आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडून घाईघाईने मिळालेला डेटा परिपूर्ण नाही. त्यामुळे त्यात ओबीसी समाजाचे नुकसान होईल, पण महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आरक्षणास उशीर लागत असला, तरी ते व्यापक असेल असा दावा त्यांनी केला.भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी मो. पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पडसादावर बोलताना त्या म्हणाल्या की, हे सर्व फार दुर्दैवी आहे. पूर्वीची राजकीय मंडळी कधी लक्ष्मणरेषा पार करत नव्हते. विदेश नितीवर भारताबाहेर जबाबदारीने बोलत होते. ते कधीही चौकटीबाहेर जात नव्हते. पण आता कोणी काय बोलते यावर नियंत्रण नसते.

पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, राज्य महिला आरोगाच्या सदस्य आभा पांडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सुरेखा ठाकरे, शाहीन हकीम, ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सलील देशमुख, वर्षा श्यामकुळे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अडकलेल्या प्रकल्पांसाठी गडकरी, यादवांशी बोलणारगडचिरोली जिल्ह्यातील अनेक विकासकामांसाठी वनकायद्याचा अडसर येत आहे. केंद्र सरकारकडे त्याबाबतचे प्रस्ताव पडले आहेत. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वने व पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी बोलेन. ते या कामात नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

पर्यावरणाचे मूल्यमापन पारदर्शकपणे करावेगडचिरोली जिल्ह्यातील लोह किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा किंवा इतर कोणत्याही खाणी असो, त्यांचे पारदर्शकपणे पर्यावरणविषयक मूल्यमापन केले पाहिजे. देशात खाणींमधून दीड लाख कोटी रुपयांचा महसूल येईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण प्रत्यक्षात १३ हजार कोटीच आले. त्याचा हिशेब त्यांनी द्यावा, असेही एका प्रश्नावर बोलताना खा.सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे