अत्याचारात दहापटीने वाढ
By Admin | Updated: May 15, 2014 23:33 IST2014-05-15T23:33:06+5:302014-05-15T23:33:06+5:30
स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यामुळे देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे.

अत्याचारात दहापटीने वाढ
देसाईगंज : स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यामुळे देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु विकासाबरोबरच सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न शासनाला योग्यरित्या सोडविता आला नाही. मागील ४0 वर्षात देशाने विकासाबाबत अनेक मैलाचे दगड पार केले. ४0 वर्षात केंद्रात विविध पक्षांचे १३ सरकार सत्तेवर आले. या सरकारने देशात सत्ता घडविली. मात्र एकाही सरकारने महिलांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले नाही. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरो म्हणजे एनसीआरबीच्या आकडेवारीने या वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक महासत्तेकडे आगेकूच करणार्या या देशात गेल्या ४0 वर्षात महिलांच्या अत्याचारात मात्र तब्बल दहापटीने वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या ६0 वर्षात देशात प्रगतीची असंख्य दालने खुली झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली. परंतु महिलांच्या सुरक्षिततेबाबत योग्य उपाययोजना करण्यात प्रत्येकच सरकारला अपयश आल्याचे अनेक घटनांवर आपल्या निदर्शनास येते. दरवर्षी महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत असल्याने महिलांना समाजात सुरक्षिततेची हमी आहे काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरवर्षी महिलांच्या अत्याचारात होणार्या टक्क्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालाने अधोरेखीत केले आहे. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोने देशातील गुन्हेगारीचा १९५३ ते २0१२ पर्यंतचा आढावा घेतला. यात ६0 वर्षात खुनांच्या घटनेत चारपट वाढ झाली. मात्र या अहवालात महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद १९७१ पासून घेण्यात आली. या अहवालात देशातील महिला ४0 वर्षापूर्वीच्या तुलनेत आजघडीला अधिक असुरक्षित असल्याचे दिसून येते. १९७१ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या २ हजार ४८७ प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. २0१२ मध्ये महिलांवरील अत्याचारांचा आलेख २४ हजार ९२३ पर्यंत गेला आहे. मागील ४0 वर्षात महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह देशात १३ सरकार आली. महिलांना आरक्षणही देण्यात आले. स्त्रियांची संख्या वाढविण्यासाठी ‘बेटी बचाव’ सारखे उपक्रम राबविल्याने २0११ च्या जनगणनेनुसार आज एक हजार पुरूषांमागे ९४0 महिला असा दर वाढला आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचे आव्हान समाजापुढे ठाकले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही महिलांवर होणार्या अत्याचारात वाढ झाली आहे. विकासाबरोबरच गुन्हेगारीचेही प्रमाण वाढल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयीची भीती नाहीशी झाली आहे. त्यामुळे शहरी भागात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास स्त्री रस्त्याने एकटी फिरू शकत नाही, अशी स्थिती शहरी भागात आहे. शासन महिला सुरक्षेविषयी कितीही कडक कायदे करत असले तरी महिलांवरील होणार्या अत्याचारात वाढ होत आहे. परंतु महिलांवरील अत्याचार रोखण्यात शासनाला अपयश आले आहे. महिला सुरक्षिततेचे आव्हान एकाही सरकारला पेलवता आले नाही, असे दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतरही अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतच असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)