शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बससाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर, तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 14:12 IST

अहेरी आगाराच्या बसेस पाेहाेचतात उशिरा, विद्यार्थ्यांची बुडते शाळा

आष्टी (गडचिरोली) : अहेरी आगाराच्या सकाळी जाणाऱ्या बसेस वेळेवर येत नाही. त्यासाठी चौडमपल्ली येथून आष्टीला येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी बसेस अडवून एसटी महामंडळ प्रति रोष व्यक्त केला. एक तास वाहतूक ठप्प झाली होती. आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत आगार व्यवस्थापक यांचेशी चर्चा केली. त्यानंतर बसेस सोडण्यात आल्या.

आलापल्ली ते आष्टी हा मार्ग पूर्णपणे उखडला असल्याने अहेरी आगाराच्या बसेस वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. रोज विद्यार्थी चौडमपल्ली येथून आष्टीला शाळेत येण्यासाठी बसस्टॉपवर उभे असतात. तासनतास वाट पाहूनही बस वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिडून गेले. शेवटी गुरूवारी शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि बसेस अडवून धरल्या. जवळपास एक तास वाहतूक खोळंबली. बसेस व ट्रकची रांग लागलेली होती. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे घटनास्थळी पोहचले व परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ आगार व्यवस्थापक यांचेशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी व पालकांशी चर्चा करुन बसेस सोडण्यात आल्या.

रस्त्यासाठी रास्ता रोको

देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील भगतसिंग वाॅर्डातून नैनपूरला जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यातच या मार्गालगत राईस मिल आणि काही इतर व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसायाचे बिऱ्हाड मांडत असल्याने रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. रस्त्यावर पडलेले अतिशय खोल खड्डे आणि रस्त्यावर उभी राहणारी जड वाहने यामुळे त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करून या समस्येकडे लक्ष वेधले.

देसाईगंज नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या नैनपूर गावाला जाण्यासाठी एकच मार्ग आहे. याच मार्गावर तिरुपती राईस मिल आहे. याच परिसरात शहरातील बहुतांश मिल आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच जड वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते. या वाहनांमुळे मोठे खड्डे पडून मुलांसह नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्यात यावा, रस्त्यावर वाहनांची पार्किंग न करता पर्यायी सोय करण्यात यावी यासाठी नगरपरिषदेला निवेदन दिले. निवेदनावर विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाagitationआंदोलनashti-acआष्टी