निवडणूक निकालानंतर बदल्यांना प्रारंभ
By Admin | Updated: May 10, 2014 00:13 IST2014-05-10T00:13:17+5:302014-05-10T00:13:17+5:30
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या १७ ते २३ मे दरम्यान व तालुकास्तरीय बदल्या ...

निवडणूक निकालानंतर बदल्यांना प्रारंभ
गडचिरोली : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या १७ ते २३ मे दरम्यान व तालुकास्तरीय बदल्या २६ ते ३१ मे या कालावधीत समुपदेशनाने करण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने काढले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर बदल्यांचा कुंभमेळा जिल्हा परिषदमध्ये भरणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी घोषीत केला जाणार आहे. त्यानंतर बरचसे कर्मचारी निवडणुकीच्या कामातून मुक्त होणार आहेत. निवडणूक निकालानंतर दुसर्या दिवशीपासून बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्वसाधारण बदल्या १८ एप्रिल २०१३ च्या बदली निर्णयानुसार घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा, कोरची, एटापल्ली व भामरागड हे पाच तालुके नक्षलग्रस्तांकडून घोषीत आहे. त्यांचा पेसामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील एकही पद रिक्त राहणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र नेमक्या याच तालुक्यांमध्ये काम करण्यास कर्मचारी वर्ग तयार होत नाही, अशी परस्परविरोधी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळते. त्यातून अनेक कर्मचारी सेटींग करून आपली बदली निश्चितस्थळी करून घेण्याचा प्रयत्न करतात. (नगर प्रतिनिधी)