प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:39+5:30

४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.

‘ST’ orphanage without passengers | प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

ठळक मुद्देमहिना उलटला : केवळ मुख्य मार्गावर मोजक्याच फेऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या ४ मे पासून जिल्ह्यांतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास शासनाने एसटीला परवानगी दिली. याला आता महिनाभराचा कालावधी उलटला. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने बोटावर मोजण्याएवढ्याच बसफेºया चालविल्या जात आहेत. ज्या उन्हाळ्यात एसटी बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, त्या बसगाड्या आता प्रवाशांवाचून पोरक्या झाल्या आहेत.
४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.
मुख्य मार्गावर काही बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यांनाही प्रवाशी मिळत नसल्याने एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. गुरूवारी गडचिरोली आगारातून अहेरीसाठी चार, आसरअलीसाठी दोन, देसाईगंज चार, कुरखेडा दोन व देसाईगंज ते कुरखेडा दोन अशा १४ फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यातून केवळ ४० टक्के भारमान आले आहे.

दुचाकींचा वापर वाढला
बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवाशी बसवायचे आहेत. एका आसनावर एकच प्रवाशी बसणार आहे. मात्र बसमध्ये गर्दी होईल. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही भिती नागरिकांमध्ये असल्याने नागरिक बसचा प्रवास टाळत आहेत. बसऐवजी स्वत:च्या दुचाकी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. दोन जिल्ह्याच्या सीमा अजुनही बंद आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करण्याची गरज नागरिकांना पडत नाही. जिल्ह्यांतर्गतचा प्रवास स्वत:च्या दुचाकी वाहनाने करीत आहेत. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. शेतीची कामे सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे फिरणे बंद होणार आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे पुन्हा कठीण होणार आहे.

Web Title: ‘ST’ orphanage without passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.