शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आजपासून विशेष मोहीम

By admin | Updated: August 24, 2014 23:29 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात तसेच मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी

ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाची तपासणी होणारगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात तसेच मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत उद्या २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाणार आहे. या विशेष तपासणी मोहिमेत शिक्षकांचाही समावेश राहणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०११ ते २०१४ या वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्यावतीने मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात वृक्ष लागवड करण्यात आली. यापैकी अनेक वृक्ष उन्हाच्या दहाकतेमुळे कोमेजली आहेत तर काही नष्ट झाली आहे. ५० ते ६० टक्के वृक्ष जिवंत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येते. ग्रामपंचायतीच्यावतीने लावण्यात आलेल्या वृक्षाचे गुरे, ढोरे व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे बहुतांश गावातील काही झाडे नष्ट झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमातील नेमके किती झाडे जिवंत आहेत, हे पाहण्यासाठी शासनाने विद्यार्थी व शिक्षक यांच्या मार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्य शासनाने १९ आॅगस्ट २०१४ रोजी नवे परिपत्रक काढून २५ आॅगस्ट २०१४ ते १५ सप्टेंबर २०१४ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.या तपासणी कार्यक्रमाचे संयनियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. तीन आठवड्याच्या या कालबद्ध कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालकाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ३०१४ पत्र क्रमांक ५७ नियोजन विभागाच्या १९ आॅगस्ट २०१४ च्या परिपत्रकानुसार एक शिक्षक व दोन विद्यार्थी यांचा समावेश असलेल्या हरित संरक्षक गटांकडून ही तपासणी केली जाणार आहे. सदर विशेष मोहीम सुटीच्या दिवशी अथवा नियोजित शाळेची वेळ संपल्यानंतर करावी लागणार आहे. एक ग्रामपंचायत, एक काम यासाठी शिक्षकाला ३०० रूपये तर विद्यार्थ्याला १५० रूपये मानधन दिले जाणार आहे. एका ग्रामपंचायतीतील तीन कामांची तपासणी केलेल्या शिक्षकाला ४०० रूपये आणि विद्यार्थ्याला २०० रूपये मानधन दिले जाणार असल्याचे १९ आॅगस्टच्या परिपत्रकात नमूद आहे. मानधनाची ही रक्कम संबंधित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यात जमा होणार आहे. तपासणी भेटी सुरू होण्यापूर्वी पंचायत समितीस्तरावर अहवाल भाग १ भरण्यात येणार आहे. या कामासाठी कृषी अधिकारी व एक कंत्राटी अधिकारी निश्चित करण्यात आले आहे. या तपासणी मोहीम कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तर सदस्य म्हणून जि. प. चे उपमुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत), उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणून रोहयोचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी व सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक यांचा समावेश राहणार आहे. या विशेष तपासणी मोहिमेचा उद्देश ग्रामपंचायतीमार्फत संबंधीत गावात वृक्ष लागवड झाली अथवा नाही, जिवंत व मृत रोपट्यांची संख्या किती हे कळणार आहे. तसेच वृक्षाच्या पुनर्रलागवडीसाठी कृती केल्या जाणार आहे. एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, तसेच हवामान चांगले राहावे यासाठी रोहयोंतर्गत गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे दोनही घटक प्रशासनापासून स्वतंत्र आहेत. यामुळे ही तपासणी मोहीम निरपेक्ष व प्रभावी होण्याची दाट शक्यता आहे. या तपासणी मोहिमेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व गावकरी तयार झाले आहेत. मात्र कोणत्या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी कोणत्या गावात जाऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाची तपासणी करणार आहेत, हे सध्या गुलदस्त्यात आहे. जि. प. प्रशासनात या मोहिमेच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणते गाव कोणत्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना तपासणीसाठी द्यावे हे ठरणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)