शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST

यावर्षीपासून पहिल्यांदाच केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेंतर्गत २३ हजार ७६८

पंतप्रधान कृषी पीक विमा योजना : कर्ज न घेतलेल्या केवळ ८१८ शेतकऱ्यांनी काढला विमागडचिरोली : यावर्षीपासून पहिल्यांदाच केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेंतर्गत २३ हजार ७६८ शेतकऱ्यांनी ३० हजार ८५१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. विम्याच्या प्रिमीअमचे २ कोटी ४१ लाख ५४ हजार रूपये शासनाकडे जमा केले आहेत. व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही कर्ज न घेणाऱ्या केवळ ८१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकरी कर्ज घेणारे असून त्यांना विमा काढणे सक्तीचे करण्यात आले होते. शेतीचा संपूर्ण खेळ निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर भरघोस उत्पादन होते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर शेतीतून नफा तर सोडाच उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य होते. अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता अधिक राहते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये विद्यमान केंद्र शासनाने बदल केला असून या योजनेचे नाव सुध्दा बदलविले आहे. सदर योजना पंतप्रधान पीक विमा योजना म्हणून सुरू केली आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली. योजनेची रूपरेषा शेतकऱ्यांना कळावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र प्रत्यक्षात हे चित्र उलटे असल्याचे दिसून येत आहे. सदर योजना कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीचे करण्यात आली होती. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचाच समावेश अधिक असल्याचे दिसून येते. एकूण २३ हजार ७६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यामध्ये २२ हजार ९५० शेतकरी हे कर्ज घेणारे आहेत. कर्ज घेणाऱ्यांना सदर योजना सक्तीची असल्याने या योजनेमध्ये त्यांना सहभाग घ्यावाच लागणार होता. कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी केवळ ८१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. याचा अर्थ शेतकरी स्वत:हून पीक विमा काढण्यासाठी गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीची योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची नव्हती. तरीही शेतकरी स्वत:हून पीक विमा काढत होते. यावर्षी मात्र स्वत:हून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)