शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पेसा कायद्यात सुधारणेसाठी जनमत आवश्यक

By admin | Updated: August 23, 2014 23:58 IST

भारतीय संविधानातील भारतीय संविधानातील तरतुदीच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रामधील सर्व जनतेच्या विकासासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला. राज्यपालाने याबाबतचा

गडचिरोली : भारतीय संविधानातील भारतीय संविधानातील तरतुदीच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रामधील सर्व जनतेच्या विकासासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला. राज्यपालाने याबाबतचा अध्यादेश ९ जून २०१४ रोजी काढला. पेसा कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तसेच सर्वांसाठी सोयीस्कर कायदा तयार होण्यासाठी सुधारणा सुचविणे गरजेचे आहे. यासाठी जनमत तयार करण्यात यावे, असा सूर उपस्थित मान्यवर वक्त्यांनी चर्चासत्रात काढला. पेसा जनजागरण समन्वय समितीच्यावतीने शनिवारी येथील गोंडवाना सभागृहात पेसा कायद्याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हिरामण वरखडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, प्रभू राजगडकर, जि. प. सदस्य अमोल मारकवार, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुतीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार हिरामन वरखडे म्हणाले, वंचित समाजाच्या हातात सत्ता देण्यासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय राज्य घटनेत तरतूद करण्यात आली. यानुसार उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचे रक्षण करणे, अनुसूचित क्षेत्रातील जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणे, हे पेसा कायद्याला अभिप्रेत आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल संभ्रम होऊ न देता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही वरखडे यांनी यावेळी म्हणाले. रोहिदास राऊत यांनी पेसा कायद्याच्या संभ्रमावरून समाजस्वास्थ बिघडणार नाही, तसेच सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी सर्व समाज घटकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी केले. प्रभू राजगडकर यांनी पेसा कायद्याबाबत जिल्ह्याच्या जनतेत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी पडेल, असे सांगितले.महेश राऊत यांनी पेसा कायद्याचे सादरीकरण कार्यक्रमात केले. तसेच या कायद्याची सखोल माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांच्या पेसा कायद्याबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी पेसा कायद्याच्या संवैधानिक तरतुदीही स्पष्ट करण्यात आल्या. संचालन वनिशाम येरमे यांनी केले तर आभार फरेंद्र कुतीरकर यांनी मानले. यावेळी पेसा कायद्यावर खुली चर्चाही करण्यात आली. याप्रसंगी अनेक उपस्थित नागरिकांनी पेसा कायद्यांच्या संभ्रमांबाबत उपस्थित मान्यवरांना विचारणा केली. उपस्थित नागरिकांना मान्यवरांनी समर्पक उत्तरही यावेळी दिली. चर्चासत्राला नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)