शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्यात सुधारणेसाठी जनमत आवश्यक

By admin | Updated: August 23, 2014 23:58 IST

भारतीय संविधानातील भारतीय संविधानातील तरतुदीच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रामधील सर्व जनतेच्या विकासासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला. राज्यपालाने याबाबतचा

गडचिरोली : भारतीय संविधानातील भारतीय संविधानातील तरतुदीच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रामधील सर्व जनतेच्या विकासासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला. राज्यपालाने याबाबतचा अध्यादेश ९ जून २०१४ रोजी काढला. पेसा कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तसेच सर्वांसाठी सोयीस्कर कायदा तयार होण्यासाठी सुधारणा सुचविणे गरजेचे आहे. यासाठी जनमत तयार करण्यात यावे, असा सूर उपस्थित मान्यवर वक्त्यांनी चर्चासत्रात काढला. पेसा जनजागरण समन्वय समितीच्यावतीने शनिवारी येथील गोंडवाना सभागृहात पेसा कायद्याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हिरामण वरखडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, प्रभू राजगडकर, जि. प. सदस्य अमोल मारकवार, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुतीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार हिरामन वरखडे म्हणाले, वंचित समाजाच्या हातात सत्ता देण्यासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय राज्य घटनेत तरतूद करण्यात आली. यानुसार उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचे रक्षण करणे, अनुसूचित क्षेत्रातील जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणे, हे पेसा कायद्याला अभिप्रेत आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल संभ्रम होऊ न देता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही वरखडे यांनी यावेळी म्हणाले. रोहिदास राऊत यांनी पेसा कायद्याच्या संभ्रमावरून समाजस्वास्थ बिघडणार नाही, तसेच सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी सर्व समाज घटकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी केले. प्रभू राजगडकर यांनी पेसा कायद्याबाबत जिल्ह्याच्या जनतेत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी पडेल, असे सांगितले.महेश राऊत यांनी पेसा कायद्याचे सादरीकरण कार्यक्रमात केले. तसेच या कायद्याची सखोल माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांच्या पेसा कायद्याबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी पेसा कायद्याच्या संवैधानिक तरतुदीही स्पष्ट करण्यात आल्या. संचालन वनिशाम येरमे यांनी केले तर आभार फरेंद्र कुतीरकर यांनी मानले. यावेळी पेसा कायद्यावर खुली चर्चाही करण्यात आली. याप्रसंगी अनेक उपस्थित नागरिकांनी पेसा कायद्यांच्या संभ्रमांबाबत उपस्थित मान्यवरांना विचारणा केली. उपस्थित नागरिकांना मान्यवरांनी समर्पक उत्तरही यावेळी दिली. चर्चासत्राला नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)