किसान सभेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: September 3, 2014 23:23 IST2014-09-03T23:23:28+5:302014-09-03T23:23:28+5:30

गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, सर्वांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका देसाईगंजच्यावतीने बुधवारी येथील

A rally on the SDO office of the Kisan Sabha | किसान सभेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

किसान सभेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

देसाईगंज : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, सर्वांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका देसाईगंजच्यावतीने बुधवारी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व डॉ. महेश कोपुलवार यांनी केले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, रोजगाराची हमी देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात जि. प. सदस्य अमोल मारकवार, हिरालाल येरमे, देवराव चवळे, विनोद झोडगे, जगदीश मेश्राम, चंद्रभान मेश्राम, पंढरी दोनाडकर, परसराम आदे, निर्मला कवासे, सुमन बोधनकर, तुलाराम नेवारे, पंढरी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. महेश कोपुलवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्य शासनाने केवळ दोनच तालुक्यात टंचाई घोषित केली आहे. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ रोख स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी केली. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A rally on the SDO office of the Kisan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.