शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात लावलेली रोपे नष्ट

By admin | Updated: October 18, 2014 01:30 IST

युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली.

वैरागड : युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली. मात्र दोन वर्षातच सदर योजना गुंडाळावी लागली होती. कमी पैशात भुकेल्यांना अन्न मिळावे हा तत्कालीन सरकारचा उद्देश प्रामाणिक होता. परंतु योजना राबविणारे हात गढूळ असल्याने सदर योजनेचा बट्याबोळ झाला. सदर योजनेचा प्रत्यय मागील तीन वर्षापासून राज्यात राबविल्या जाणाऱ्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या रूपात आला आहे. वैरागड येथे पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा तिनदा झाडे लावण्यात आली. परंतु सदर रोपटे अल्पवधीतच नष्ट झाली. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजना ुफसवी असल्याचे दिसून आले आहे.शतकोटी वृक्ष लागवड योजनेची असफलता बघता, सदर योजना आजमितीला सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून सुरू करण्यात आलेली शेतकोटी वृक्ष लावगड योजना जिल्ह्यात फारशा प्रमाणात परिणामकारक ठरू शकली नाही. जिल्ह्यातील योजनेचे सत्य आता बाहेर पडू लागले आहे. शाळेमधून हरितसेनेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी केलेल्या तपासणीत निम्म्याहून अधिक वृक्ष मृत झाल्याचे दिसून आले आहे. मागील तीन वर्षात प्रशासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे काम न केल्याचा परिणाम सदर योजनेवर झाला आहे. पहिल्या वर्षात लावलेली रोपटे जगली नाहीत, म्हणून त्याच ठिकाणी दुसऱ्या वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली. तरीही दुसऱ्यांदा लावलेली रोपटे अल्पावधीतच मृतप्राय झाली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या यशस्वीतेचा बागुलबुवा करण्यासाठी तेवढाच निधी खर्च करून तिसऱ्यांदा झाडे लावण्यात आली. परंतु या योजनेत भरपूर प्रमाणात पैसे असल्याने काही विशिष्ट लोकांचेच खिसे गरम करण्याचे काम सदर योजनेच्या माध्यमातून झाले आहे, असा आरोप अनेक ग्रामीण स्तरावरील लोकांकडून होत आहे. जिल्हा वनव्याप्त असतानाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सदर योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे या योजनेची खरच गरज होती काय, असाही प्रश्न उपस्थित होते आहे. अनेक रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. त्या ठिकाणी आधिच जंगल होते. छोट्या रोपांच्या संरक्षणासाठी मोठ्या वृक्षांची तोड करून कुंपण करण्यात आले. रोपांच्या संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. रोपही नष्ट झाले. त्यामुळे या योजनेतून काय साध्य झाले, असाही प्रश्न निर्माण होत आहे. (वार्ताहर)