शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते.  यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली.

ठळक मुद्देसरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही पडला कमी पाऊस; केवळ सिंचनाची साेय असलेल्याच शेतकऱ्यांनी आटाेपली कामे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील गडचिराेली, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, धानाेरा या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तर पावसाने दडीच मारली असल्याने जिल्ह्यात काेरडा दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली. आता मात्र राेवण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी राेवणी केली त्यांचे धान करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४५.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ४०१.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. सिराेंचा व देसाईगंज या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. उर्वरित दहा तालुक्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.सिचंनाची साधने असलेले शेतकरी तसेच नदी, नाल्यालगत शेती असलेले शेतकरी धान राेवणीचे काम करीत आहेत. परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जाेरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.  

राेवणीची कामे पडली ठप्प - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात आहे अशा शेतकऱ्यांनी धान रोहिणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांद्यांमधील पाणी आटायला सुरुवात झाली आहे. परिणामी रोहिणीची कामे रखडली आहेत. धान लावणीच्या कामाला उशीर झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.- यावर्षी माेठा पाऊस अजूनही झाला नाही. एखादी तास पाऊस पडल्यानंतर लगेच ऊन निघते. त्यामुळे तापमान वाढत आहे. पाऊस व कडक ऊन यामुळे उकाड्यात वाढ आहे. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

जलसाठे अर्धे रिकामेचजिल्ह्यात अजूनही माेठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावाच्या जलसाठ्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. मागील वर्षी जेवढा पाणीसाठा हाेता. त्यात थाेडी वाढ झाली आहे. तर जे जलसाठे पावसाळ्यापूर्वी काेरडे हाेते. ते आताही काेरडेच आहेत. विशेषकरून दरवर्षी उन्हाळ्यात बाेड्या काेरड्या पडतात. त्या आताही काेरड्याच आहेत. जाेपर्यंत जलसाठे भरत नाही. ताेपर्यंत उत्पादनाही हमी राहत नसल्याने शेतकरी समाधानी राहत नाही. 

 

टॅग्स :Rainपाऊस