शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

वीज पोहोचण्यापूर्वी विसोऱ्यात पोहोचले होते रेडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

अतुल बुराडे विसोरा : मनोरंजसाठी गाणी ऐकणे, जगाची खबर जाणून घेण्यासाठी बातम्या ऐकणे यासाठी अर्धशतकापूर्वीच्या काळात रेडिओ हे एकमेव ...

अतुल बुराडे

विसोरा : मनोरंजसाठी गाणी ऐकणे, जगाची खबर जाणून घेण्यासाठी बातम्या ऐकणे यासाठी अर्धशतकापूर्वीच्या काळात रेडिओ हे एकमेव साधन होते. ज्यांच्याकडे रेडिओ आहे ते लोक श्रीमंत म्हणून गणल्या जात. अरण्यपट्ट्यात वसलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा या गावात आजही त्या काळातील रेडिओच्या आठवणी जाग्या करणाऱ्या व्यक्ती आहेत. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी १९६० मध्ये या गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव परशुरामकर यांनी चंद्रपूर येथून रेडिओ विकत घेऊन आणला होता. या भागातील तो पहिला रेडिओ होता.

गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.

या रेडिओवर नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकले जात होते. विशेष बाब म्हणजे, तब्बल ६० वर्षांपूर्वी विसोरात जेव्हा पहिला रेडिओ आला, तेव्हा गावात वीजसुद्धा आलेली नव्हती. सन १९६४ ला विसोरात वीज पाेहाेचली. रेडिओ दाखल झाले, त्यावेळी गावामध्ये टीव्हीचा पत्ता नव्हता. म्हणजेच परशुरामकर यांनी आणलेला रेडिओ विसोरातले पहिलावहिले प्रसारमाध्यम होते. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. गावामध्ये रेडिओ ऐकण्यास सकाळपासून वीस-पंचवीस लोकांची सतत गर्दी असायची. त्यानंतर, फिलिप्स, मर्फी, नेल्को या कंपनींचे रेडिओ विसोरा येथे आणल्या गेले. रेडिओ आगमनाच्या पूर्वी गावातील कुणी शहराच्या ठिकाणी शिकत असेल वा जात असेल, तो व्यक्ती गावात आल्यावर वाचून-ऐकून देशातील, जगातील घटनांची माहिती देत असे. तेव्हा रेडिओच्या बॉक्समधून आवाज ऐकू येणे हे आश्चर्यच होते. म्हणूनच रेडिओ ऐकण्यास लोकांची गर्दी व्हायची. विसोरा येथील काही धनाढ्य लोक नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अशा शहरांत नेहमी जात, त्यामुळे त्यांना बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंची माहिती व्हायची आणि ते खरेदी करीत.

बाॅक्स

टीव्ही, माेबाइलने घेतली रेडिओची जागा

२० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात माेबाइल पाेहाेचला नव्हता, तर टीव्ही घेणे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नव्हते, तसेच गावात असलेली टीव्ही अँटिनावर चालविली जात असल्याने, या टीव्हीवर दूरदर्शन हा एकच चॅनल दिसत हाेता. त्यामुळे टीव्ही बघायसाठीही कंटाळा येत हाेेता. परिणामी, सर्वसामान्य व्यक्ती रेडिओच खरेदी करीत हाेेता. मात्र, डीटीएच सेवा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यानंतर अनेक चॅनल दिसायला लागले, तसेच टीव्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा हाेऊन टीव्हीच्या किमती सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आल्याने नागरिक टीव्ही खरेदी करायला लागले. त्यानंतर, आलेल्या स्मार्ट माेबाइलवर साेशल मीडियाचा विस्तार हाेऊन नागरिक रेडिओला विसरण्यास सुरुवात झाले आहेत.