शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

१३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही.

ठळक मुद्दे२,८७३ अजूनही निरीक्षणाखाली : एकूण १६ हजार ६०८ नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एकूण १६ हजार ६०८ नागरिकांपैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित २ हजार ८७३ नागरिकांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण व्हायचा आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेला, मात्र होम क्वॉरंटाईनसाठी नोंदणी न करताच एखादा नागरिक गावात फिरत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. सामान्य व्यक्तीला आजाराची लक्षणे दिसून आली नसली तरी त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अचानक आजारी अथवा आरोग्यविषयक तक्रारी असल्यास त्यांनी आपली माहिती जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाचा प्रसार थांबविण्याबाबत आशा वर्कर व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. इतरही विभागांचे अधिकारी व कर्मचाºयांनीही स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यांनी पुढे केला मदतीचा हातगडचिरोली येथील अभिलाष चुटे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. तसेच गडचिरोली येथील विजय चौधरी यांनी २५ हजार रुपये, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी २५ हजार रुपये, आरमोरी येथील प्रविण राहाटे यांनी ३ हजार रुपये तसेच फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोलीतफे १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे. अडचणीच्या कालावधीत दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गर्दीचे कार्यक्रम घेतल्यास आयोजकावर गुन्हाकोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नसून सण, उत्सव घरीच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोणी गर्दी होणारा एखादा कार्यक्रम घेतला तर आयोजकावर गुन्हा दाखल होईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.येत्या काळात हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महात्मा फुले जयंती, इस्टर संडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व इतर काही सार्वजनिक उत्सवाचे कार्यक्रम येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच उत्सव साजरे करावे, याबाबत धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे. कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी गर्दी झाल्यास आयोजकासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणालाही कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे कार्यक्रम घेण्याकरिता प्रशासनाकडे मागणी करू नये. सर्व स्तरावर संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गरजूंची माहिती तहसीलदारांना द्यासंचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने एखादे कुटुंब किंवा नागरिक अडचणीत असेल तर याबाबतची माहिती संबंधित तहसीलदारांना द्यावी. तसेच जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या मदत केंद्रावरही संपर्क साधून अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस