शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जिल्ह्यात ३९ नव्या आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव; आरोग्य सेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:57 IST

Gadchiroli : दुर्गम भागात सेवा बळकटीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम, अतिदुर्गम भागांतील आरोग्यसेवेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. कधी रुग्णाला खांद्यावर घेऊन धावाधाव करणारे रुग्णांचे नातेवाईक, तर कधी खाटेची कावड करून मैलोनमैल पायपीट करतानाचे हे विदारक चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात नवीन ३९ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाला पाठविला आहे. आरोग्य सेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आदिवासीबहुल व अविकसित गडचिरोलीत दुर्गम, अतिदुर्गम पाडे, वस्त्या आहेत. अनेक ठिकाणी पावसाळ्यात संपर्क तुटतो, त्यामुळे रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचताना कसरत करावी लागते, शिवाय अशिक्षित कुटुंबे डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे जाऊन उपचार घेतात, यात वेळ वाया जातो, प्रकृती खालावत गेल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी रुग्णालयात आलेल्या रुग्णाला वाचविताना डॉक्टरांचाही कस लागतो. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी व आरोग्य सेवा अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी जि.प. सीईओ सुहास गाडे यांच्या मागर्दशनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी ३९ नव्या उपकेंद्रांचा आराखडा बनविला आहे.

४ नवे प्राथमिक आरोग्य केंद्र गोगवाडा, मसेली, देऊळगाव व पारडी येथे प्रस्तावित आहेत. यामुळे उपलब्ध शासकीय आरोग्य संस्थांवरील ताण कमी होणार आहे. ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३७६ उपकेंद्रे जिल्ह्यात आहेत. ३ उपजिल्हा रुग्णालये असून ग्रामीण रुग्णालयांची संख्या ९ आहे.

प्रस्तावित आरोग्य उपकेंद्रे

  • गडचिरोली : बोदली, काळशी, पोटेगाव, मारदा
  • आरमोरी : वडधा, देलनवाडी
  • देसाईगंज : कोरेगाव, एकलपूर, कसारी
  • कोरची : कोचीनारा, जांभळी, बाको
  • धानोरा : मुरुमगाव, रांगी, आंबेझरी, जांभळी
  • चामोर्शी : रवींद्रपूर, कान्होली, विकासपल्ली, रेगडी, वरुर
  • मुलचेरा : हरिनगर, श्रीनगर, देशबंधूग्राम, शांतीग्राम
  • अहेरी: देचली, चिंतलपेठ, कमलापूर, जिमलगट्टा, सिरोंचा अंकिसा
  • एटापल्ली : कचलेर, कुदरी
  • भामरागड : आरेवाडा, हेमलकसा, मोकेला

लोकसंख्या वाढली, परराज्यातूनही येतात रुग्ण११ लाख ६७ हजार ७३४ इतकी लोकसंख्या जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार आहे. मात्र, १४ वर्षांत लोकसंख्येत वाढ झाली आहे. सोबतच अहेरी व भामरागडमध्ये लगतच्या छत्तीसगड राज्यातील, तर सिरोंचात शेजारच्या तेलंगणातून रुग्ण येतात, परिणामी यंत्रणेवर ताण वाढतो.

"पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो, त्यामुळे नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव बनविला आहे. ज्यामुळे त्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील. उपकेंद्रांसाठी आवश्यक सर्व त्या अटी, शर्थी पूर्ण करूनच हा प्रस्ताव बनविला आहे."- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यGadchiroliगडचिरोली