शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

पोलीस दलाने मिळवून दिला १४० तरुणांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:00 AM

पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. 

ठळक मुद्देहैदराबादमध्ये देणार सेवा, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्या तरुणांनी कधी जिल्ह्याच्या बाहेरची दुनिया पाहिली नाही त्या दुर्गम भागातील १४० होतकरू बेरोजगार युवकांना हैदराबादसारख्या शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे त्या युवकांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक विकासाचा नवीन आशेचा किरण यानिमित्ताने दिसणार आहे.पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाने रोजगार मेळावा ॲप तयार केले. या ॲपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी नाव नोंदणी केली. त्यानुसार जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली आदी उपविभागांतर्गत येणाऱ्या दुर्गम गावांमधील १४० बेरोजगारांना हैदराबादच्या एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केला. या काऱ्यक्रमासाठी संबंधित उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांसल नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विकासासाठी ठरणार मैलाचा दगडनक्षलवादी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे आणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांची दिशाभूल करून दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे अनेक तरुण गुणवत्ता असूनही रोजगारापासून वंचित राहीले आहेत. पण त्या तरुणांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक गोयल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबविला गेलेला हा उपक्रम नक्षलविरोधी अभियानासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासाला चालना देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर असलेली बेराेजगारीची समस्या आणि त्याचा नक्षलवाद्यांकडून घेतला जाणारा गैरफायदा टाळण्यासाठी पाेलीस विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत हाेत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस