शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विकासाच्या केवळ बाता! नागरिकांना नदीच्या पाण्यातून वाट काढतच पाेहाेचावे लागते गावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:59 IST

पुलाअभावी दहा गावातील नागरिक भोगताहेत नरकयातना

एटापल्ली (गडचिरोली) : बांडिया नदीवर अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने नदीपलीकडच्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावांतील नागरिक आजही विकासाची आस लावून आहेत.

शासन देशाच्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या लोकांच्या विकासाच्या गप्पा मारत असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव काही वेगळेच आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विकासाची गंगा अद्यापही पोहोचलेली नाही. एटापल्ली तालुक्यातील अशीच दहा गावे विकासाची आस लावून बसली आहेत. पुलाअभावी या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांसाठी या गावातील नागरिकांना झगडावे लागत आहे. प्रशासन व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पूल बांधून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

मूलभूत सुविधांचीही मारामार

एटापल्ली तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपरी, बुर्गी, जिजावंडी, इरफानार व इतर दोन गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचलेली नाही. या गावांमध्ये जाण्यासाठी बांडिया नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यानंतरही या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात संबंधित गावांचा तहसील मुख्यालयाशी संपर्क तुटतो. गेल्या सात दशकांपासून येथील नागरिक बांडिया नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहेत. आवश्यकतेनुसार विकासाची गंगा संबंधित गावांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे संबंधित गावातील नागरिक विकासासाठी तळमळत आहेत.

या पुलामुळे वाढेल दोन राज्यांतील व्यापार

एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे या तालुक्याच्या दुर्गम भागातील लोक छत्तीसगडमधील लोकांशी बहुतांश व्यवहार करतात. केवळ बांडिया नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील जनतेला व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांडिया नदीवर पूल बांधल्यास दोन्ही राज्यातील नागरिकांची सोय होऊन व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असाही सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRural Developmentग्रामीण विकासriverनदीGadchiroliगडचिरोली