शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विकासाच्या केवळ बाता! नागरिकांना नदीच्या पाण्यातून वाट काढतच पाेहाेचावे लागते गावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:59 IST

पुलाअभावी दहा गावातील नागरिक भोगताहेत नरकयातना

एटापल्ली (गडचिरोली) : बांडिया नदीवर अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने नदीपलीकडच्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावांतील नागरिक आजही विकासाची आस लावून आहेत.

शासन देशाच्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या लोकांच्या विकासाच्या गप्पा मारत असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव काही वेगळेच आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विकासाची गंगा अद्यापही पोहोचलेली नाही. एटापल्ली तालुक्यातील अशीच दहा गावे विकासाची आस लावून बसली आहेत. पुलाअभावी या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांसाठी या गावातील नागरिकांना झगडावे लागत आहे. प्रशासन व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पूल बांधून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

मूलभूत सुविधांचीही मारामार

एटापल्ली तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपरी, बुर्गी, जिजावंडी, इरफानार व इतर दोन गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचलेली नाही. या गावांमध्ये जाण्यासाठी बांडिया नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यानंतरही या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात संबंधित गावांचा तहसील मुख्यालयाशी संपर्क तुटतो. गेल्या सात दशकांपासून येथील नागरिक बांडिया नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहेत. आवश्यकतेनुसार विकासाची गंगा संबंधित गावांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे संबंधित गावातील नागरिक विकासासाठी तळमळत आहेत.

या पुलामुळे वाढेल दोन राज्यांतील व्यापार

एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे या तालुक्याच्या दुर्गम भागातील लोक छत्तीसगडमधील लोकांशी बहुतांश व्यवहार करतात. केवळ बांडिया नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील जनतेला व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांडिया नदीवर पूल बांधल्यास दोन्ही राज्यातील नागरिकांची सोय होऊन व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असाही सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRural Developmentग्रामीण विकासriverनदीGadchiroliगडचिरोली