शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

कोरचीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Published: January 07, 2016 2:05 AM

संपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे.

एकच पाणीटाकी : अतिक्रमणाने वाहतुकीचा खोळंबा, कचऱ्याने तुंबल्या नाल्यालिकेश अंबादे कोरचीसंपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश वॉर्डांमध्ये पाण्याचा पुरवठा होत नाही. नवीन वस्तीमध्ये नगर पंचायतीने अजूनही पाणी पाईपलाईन टाकली नाही. त्यामुळे या भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या समस्येबरोबरच बंद पथदिवे, कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, रस्त्याच्या लगत फेकण्यात येत असलेला कचरा व आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कोरचीवासीय त्रस्त झाले आहेत. नगर पंचायतीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरची नगर पंचायत झाल्याची घोषणा झाल्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला होता. तरूणांनी त्या दिवशी जल्लोषही साजरा केला. नगर पंचायत स्थापन झाल्याने अधिकचा निधी मिळून शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा या जल्लोषामागे होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत परिस्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही. उलट नगर पंचायत स्थापन झाल्यामुळे काही कामे ठप्प पडली असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पथदिवे नाहीत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. काही वॉर्डांमध्ये विद्युत खांब बसविण्यात आले नाही. कोरची येथे आठवडी बाजार भरतो. परिसरातील १५ ते २० गावातील नागरिक आठवडीबाजारासाठी येतात. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी कोरची शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. मुख्य रस्त्याच्या बाजुलाच दुकानदार दुकान लावत असल्याने वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढते. कोरची तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी कोरची येथेच राहून ये-जा करतात. कोरची हे तालुकास्थळही आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार नगर पंचायतीकडे जास्तीचे स्वच्छता कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र नगर पंचायत स्थापन होऊनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विहीर बनली कचराकुंडीकोरची शहरातील बाजारालगत विहीर आहे. मागील काही वर्षांपासून नागरिक या विहिरीचे पाणी भरत नाही. त्यामुळे नागरिकांनी या विहिरीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी सुरू केला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून कचरा कुजतो व याचा दुर्गंध सभोवतालच्या नागरिकांना पसरत आहे. सभोवतालच्या नागरिकांनाही सामाजिक जबाबदारीचे काहीच भान नाही. तेच या ठिकाणी कचरा टाकत आहेत. दुसरे म्हणजे नगर परिषदेनेही जवळपासच्या परिसरात कचराकुंडी ठेवली नाही. त्यामुळे विहीरच कचराकुंडी माणून विहिरीमध्ये कचरा टाकला जात आहे. कचऱ्याची समस्या संपूर्ण कोरची शहरात गंभीर आहे. कचराकुंड्या ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. मात्र ग्रामपंचायतीनंतर नगर पंचायतीनेही कचराकुंड्या ठेवण्याबाबत फारशी गंभीरता दाखविली नाही. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे वाढले आहेत. सदर ढिगारे उचललेसुद्धा जात नाही. त्यामुळे वर्षोनवर्ष कचरा पडून राहतो. काही प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्यामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.