शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

कोरचीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: January 7, 2016 02:05 IST

संपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे.

एकच पाणीटाकी : अतिक्रमणाने वाहतुकीचा खोळंबा, कचऱ्याने तुंबल्या नाल्यालिकेश अंबादे कोरचीसंपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश वॉर्डांमध्ये पाण्याचा पुरवठा होत नाही. नवीन वस्तीमध्ये नगर पंचायतीने अजूनही पाणी पाईपलाईन टाकली नाही. त्यामुळे या भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या समस्येबरोबरच बंद पथदिवे, कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, रस्त्याच्या लगत फेकण्यात येत असलेला कचरा व आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कोरचीवासीय त्रस्त झाले आहेत. नगर पंचायतीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरची नगर पंचायत झाल्याची घोषणा झाल्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला होता. तरूणांनी त्या दिवशी जल्लोषही साजरा केला. नगर पंचायत स्थापन झाल्याने अधिकचा निधी मिळून शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा या जल्लोषामागे होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत परिस्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही. उलट नगर पंचायत स्थापन झाल्यामुळे काही कामे ठप्प पडली असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पथदिवे नाहीत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. काही वॉर्डांमध्ये विद्युत खांब बसविण्यात आले नाही. कोरची येथे आठवडी बाजार भरतो. परिसरातील १५ ते २० गावातील नागरिक आठवडीबाजारासाठी येतात. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी कोरची शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. मुख्य रस्त्याच्या बाजुलाच दुकानदार दुकान लावत असल्याने वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढते. कोरची तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी कोरची येथेच राहून ये-जा करतात. कोरची हे तालुकास्थळही आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार नगर पंचायतीकडे जास्तीचे स्वच्छता कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र नगर पंचायत स्थापन होऊनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विहीर बनली कचराकुंडीकोरची शहरातील बाजारालगत विहीर आहे. मागील काही वर्षांपासून नागरिक या विहिरीचे पाणी भरत नाही. त्यामुळे नागरिकांनी या विहिरीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी सुरू केला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून कचरा कुजतो व याचा दुर्गंध सभोवतालच्या नागरिकांना पसरत आहे. सभोवतालच्या नागरिकांनाही सामाजिक जबाबदारीचे काहीच भान नाही. तेच या ठिकाणी कचरा टाकत आहेत. दुसरे म्हणजे नगर परिषदेनेही जवळपासच्या परिसरात कचराकुंडी ठेवली नाही. त्यामुळे विहीरच कचराकुंडी माणून विहिरीमध्ये कचरा टाकला जात आहे. कचऱ्याची समस्या संपूर्ण कोरची शहरात गंभीर आहे. कचराकुंड्या ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. मात्र ग्रामपंचायतीनंतर नगर पंचायतीनेही कचराकुंड्या ठेवण्याबाबत फारशी गंभीरता दाखविली नाही. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे वाढले आहेत. सदर ढिगारे उचललेसुद्धा जात नाही. त्यामुळे वर्षोनवर्ष कचरा पडून राहतो. काही प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्यामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.