स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...
विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...
पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ...
गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला. ...
तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे. ...
नक्षलग्रस्त भागातील समस्यांचे निकारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. ...
महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम १ आॅगस्टपासून धडाक्यात सुरू केली आहे. मागील आठ दिवसात सहा तालुक्यातील १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिलाची पूर्ण वसुली होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी द ...
सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा स ...