तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी शेकडो भाविक आले होते. सकाळपासूनच गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यातील सोमवार दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ...
जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भा ...
मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. ...
पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे. ...
येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...
विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...
पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...