शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बारदाण्याअभावी धान खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:08 IST

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांवर तुटवडा : एकाही शेतकऱ्याला चुकाºयाची रक्कम मिळाली नाही

घनश्याम म्हशाखेत्री ।लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजिन लावून धानाची शेती पिकविली. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी अपेक्षित उत्पन्न झाले नाही. धानाच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाची परतफेड करण्याकरिता शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान आणून ठेवत आहेत. ‘अ’ प्रतीच्या धानाला १७७० रूपये व ‘क’ प्रतीच्या धानाला १७५० रूपये भाव दिला जात आहे. धानोरा तालुक्यात आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्था धानोरा, मुरूमगाव, रांगी, दुधमाळा व कारवाफा येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र सोडे, मोहली, पेंढरी, गट्टा, सुरसुंडी, सावरगाव, येरकड येथील धान खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकºयांना खासगी व्यापाºयांना धान विकावे लागत आहे.धानोरा येथील धान खरेदी केंद्राला भेट दिली असता, खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्याचे दिसून येत आहे. बारदाना नसल्याने काही शेतकºयांचे धान खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. पावसाने धान भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:ची ताडपत्री झाकून ठेवली आहे.यावर्षी धानोरा केंद्रावर फक्त पाच हजार बारदाना उपलब्ध करून देण्यात आला होता. हा बारदाना काही दिवसांतच संपला. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी स्वत:चा बारदाना आणला आहे, अशाच शेतकºयांचे धान खरेदी केले जात आहे.बाजारात एका बारदान्याची किंमत २० ते २५ रूपये आहे. मात्र शासन केवळ १५ रूपये देत आहे. त्यातही प्रती बारदाना १० रूपये नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धानोरा तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.९ हजार क्विंटल खरेदीतालुक्यातील पाचही केंद्रांवर ९ हजार २०७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेदी केंद्रावर वेळेवर चुकारा होत नसल्याने काही धानोरा तालुक्यातील शेतकरी खासगी व्यापाºयांना धान विकत असल्याचे दिसून येत आहे.धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्रांकरिता एक लाख बारदान्याची मागणी केली आहे. दोन ते तीन दिवसांत बारदाना उपलब्ध होईल. तसेच बारदान्यासाठी पाच रूपये वाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. आॅनलाईनची कामे पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे देण्यास उशीर होत आहे. ते लवकर देण्यात येतील.- डी.एस.चौधरी, उपव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालय, धानोरा

टॅग्स :Farmerशेतकरी