शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

४५० वर शेततळे पूर्ण

By admin | Updated: April 3, 2017 02:16 IST

राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत

१६७ लाख रूपयांचा खर्च : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून सिंचन गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५० वर शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १६७.१७ लाखांचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बाराही तालुके मिळून एकूण १ हजार ५०० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने आवाहन केल्यानंतर बाराही तालुक्यातून एकूण ४ हजार १२९ शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर केले. सेवा शुल्क भरलेल्या एकूण ३ हजार ५४७ शेतकऱ्यांपैकी शासन निर्णयानुसार ३ हजार ३५१ शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या लाभासाठी कृषी विभागाने पात्र ठरविले. कृषी विभागाने १ हजार ४१२ शेततळ्याच्या कामास मंजुरी प्रदान केली. यापैकी १ हजार ३४० शेततळ्यांच्या कामास कार्यारंभ आदेश कृषी विभागातर्फे देण्यात आले. यापैकी आतापर्यंत ४११ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सद्य:स्थितीत १३३ शेततळ्याचे काम सुरू आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यात आले. या शेततळ्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. याशिवाय जलयुक्त शिवार अभियानातूनही जलसंधारणाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. आता शेततळ्याच्या कामाने जिल्हाभरात वेग घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) त्रुट्यांमुळे ४३ अर्ज अपात्र शेततळ्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनाी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केलेत. मात्र या अर्जासोबत सातबारा, शेत जमिनीचा नकाशा व इतर महत्त्वाचे दस्तावेज संबंधित शेतकऱ्याांनी सादर केले नाही. शेतकऱ्यांनी सेवा शुल्क भरूनही कृषी विभागाच्या वतीने ४३ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यातील १५, अहेरी तालुक्यातील १६ व भामरागड तालुक्यातील १२ अर्जांचा समावेश आहे. त्रुट्या पूर्ण करून पुढील वर्षात सुधारीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या कामात गडचिरोली तालुका अव्वल जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ९६ शेततळ्याचे काम संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. त्या खालोखाल अहेरी तालुक्यात ८१, तर एटापल्ली तालुक्यात ७३, धानोरा तालुक्यात ३७ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर तालुके माघारले असून या तालुक्यांमध्ये ५ ते २० पर्यंत अशी पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या आहे.