शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

घराबाहेर पडणाऱ्यांची गडचिरोली वाहतूक पोलिसांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली.

ठळक मुद्देसंचारबंदीची कडक अंमलबजावणी : कारणानुसार दाखवावी लागतात कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने २३ जानेवारीपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाºया वाहनधारकांचे वाहन अडवून गडचिरोली वाहतूक पोलीस तपासणी करीत असल्याचे चित्र गुरूवारी गडचिरोलीत पहायला मिळाले. घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात आहे. कारणाशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू दाखविल्यावरच त्यांना सोडले जात आहे.राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली. मात्र पोलिसांच्या धोरणावर राज्यभरातून टिका सुध्दा झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक मारू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानुसार आता गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.पोलीस ये-जा करणाऱ्या नागरिकांचे वाहन अडवून बाहेर निघण्याचे कारण विचारत आहेत. एखादे कारण सांगितल्यानंतर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू आहेत काय, हे सुध्दा विचारले जात आहे. एखाद्या व्यक्तीने भाजीपाला घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले तर त्याच्याकडे थैली आहे काय हे बघितले जाते. मेडीकलमध्ये जातो असे सांगितले तर त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी आहे काय, हे बघितले जात आहे. तसेच संपूर्ण शहरात गस्त घालून नागरिक अनावश्यक बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक अजुनही नियंत्रणात आहे.नागरिकांनी गैरफायदा घेऊ नयेकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन हे कठोर निर्णय घेतले आहेत. संचार बंदीतही आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले आहे. त्यादृष्टीनेच पोलीस विचारपूस करीत आहेत. ठोस कारण सांगितल्यानंतरच सोडले जात आहे. मात्र या संधीचा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.गडचिरोलीच्या गुजरीत पोलीस तैनातगडचिरोली येथे भरणारा आठवडी बाजार रद्द झाला आहे. तसेच इतर ठिकाणी होणारी भाजी विक्री सुध्दा बंद झाली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक गडचिरोली शहरातील गुजरीत मोठ्या प्रमाणात येत आहेत. गुजरीमध्ये गर्दी उसळून भाजीपाला खरेदी करताना मोठी गर्दी उसळते. तसेच अंतर ठेवण्याचे नियमही पाळले जात नव्हते. ही बाब लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने अंतर पाडण्यासाठी डबे आखले आहेत. तसेच गुजरीत तीन पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेते व ग्राहक अंतराच्या नियमाचे पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस