शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणचे वाढले टेन्शन : लॉकडाऊनमधील वीज वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीपासून थकीत बिलाची रक्कम वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चार महिन्यांमधील ३९ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याने अनेक ग्राहकांना बिल भरणे शक्य झाले नाही. सप्टेंबर महिना उलटूनही काही ग्राहकांनी अजूनपर्यंत वीज बिलाचा भरणा केला नाही.एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरातील ग्राहकांनी १०३.६८ कोटी रुपयांचा वीज वापर केला. पण प्रत्यक्षात ६२ कोटी ७५ लाख एवढीच वसुली झाली आहे. एकूण वीज बिलाच्या केवळ ६०.५२ टक्के एवढीच वसुली झाल्याने महावितरणपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. महावितरणला कर्मचारी, वीज खरेदी, वीज निर्मिती, शासकीय कार्यालयाचा खर्च आदींवर नियमित खर्च करावा लागतो. अगोदरच महावितरणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात वीज बिल थकल्याने आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरण आता वीज बिल वसुलीला गती देण्याची शक्यता आहे.वीज माफीच्या चर्चेचा परिणामलॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल काही प्रमाणात माफ केले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या काही मंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात आढावा घेतला असता, वीज बिल माफ करणे शक्य नाही, असा शेरा वित्त विभागाने मारला. त्यानंतर वीज बिल माफ होण्याच्या चर्चा बंद झाल्या. मात्र या चर्चांमुळे क्षमता असलेल्या नागरिकांनीही वीज बिलाचा भरणा केला नाही. आता. पाच महिन्यांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पैशातूनच महावितरणचा सर्व खर्च भागविला जाते. चांगली सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलाचा नियमित भरणा करावा. वीज पुरवठा खंडीत करण्याची पाळी महावितरणवर येऊ देऊ नये.- विजय मेश्राम,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज