शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

केवळ २५ टक्के भाग मोबाईलच्या कव्हरेजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:21 IST

संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे.

ठळक मुद्दे१२३ टॉवर प्रस्तावित : जिल्ह्यासाठी आणखी २१२ टॉवरची गरज

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे. संपूर्ण जिल्हा मोबाईल कव्हरेजमध्ये आणण्यासाठी तब्बल ५०० पेक्षा जास्त टॉवरची गरज असताना आता जेमतेम १०७ टॉवर कार्यरत असून ८९ टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे.जंगलाचा प्रदेश आणि नक्षलवादी कारवायांमुळे मोबाईल सेवा देणाºया खासगी कंपन्या या जिल्ह्यात आपले हातपाय पसरायला इच्छुक नसतात. त्यामुळे शहरी भाग आणि नक्षली कारवायांपासून मुक्त असणाºया भागातच त्यांचे टॉवर लागले आहेत. पण सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (भारत संचार निगम लि.) ने जिल्ह्यात मोबाईल कव्हरेजचे जाळे विणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल टॉवरची उभारणी सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०७ टॉवरवर बीएसएनएल तब्बल ३ लाख ६४ हजार मोबाईल ग्राहकांचा ताण सहन करीत आहे. दर महिन्याला ६ हजारांपेक्षा जास्त नवीन ग्राहकांची भर त्यात पडत आहे. आतापर्यंत सर्व १०७ टॉवरवरून २ जी इंटरनेट सेवा मिळत होती.आता त्या टॉवरवरून ३ जी सेवा देण्यास सुरूवात झाली आहे. सरकारने परवानगी दिल्यास ४-जी सेवाही सहज मिळू शकते, मात्र केंद्र सरकारने त्यासाठी परवानगी दिलेली नाही.८९ नवीन टॉवरची उभारणीएप्रिल २०१७ पासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मंजूर झालेल्या ८९ नवीन टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यापैकी १७ टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. त्यात गडचिरोली तालुक्यात ६, चामोर्शी तालुक्यात ३, कुरखेडा तालुक्यात ३, देसाईगंज तालुक्यात २, आरमोरी २ तर मुलचेरा तालुक्यात १ टॉवर उभारण्यात आला आहे.यासोबतच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) १०३ टॉवरच्या मागणीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. तो मान्य झाला आहे. मात्र निधीअभावी त्या टॉवरच्या उभारणीचे काम थांबले आहे. याशिवाय बीएसएनएलने आणखी २० टॉवरच्या मंजुरीचा प्रस्ताव नुकताच पाठविला आहे. या सर्व टॉॅवरनंतर किमान अर्धा जिल्हा मोबाईलच्या कव्हरेजमध्ये येईल.

टॅग्स :Mobileमोबाइल