शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

केवळ २५ टक्के भाग मोबाईलच्या कव्हरेजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:21 IST

संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे.

ठळक मुद्दे१२३ टॉवर प्रस्तावित : जिल्ह्यासाठी आणखी २१२ टॉवरची गरज

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे. संपूर्ण जिल्हा मोबाईल कव्हरेजमध्ये आणण्यासाठी तब्बल ५०० पेक्षा जास्त टॉवरची गरज असताना आता जेमतेम १०७ टॉवर कार्यरत असून ८९ टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे.जंगलाचा प्रदेश आणि नक्षलवादी कारवायांमुळे मोबाईल सेवा देणाºया खासगी कंपन्या या जिल्ह्यात आपले हातपाय पसरायला इच्छुक नसतात. त्यामुळे शहरी भाग आणि नक्षली कारवायांपासून मुक्त असणाºया भागातच त्यांचे टॉवर लागले आहेत. पण सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (भारत संचार निगम लि.) ने जिल्ह्यात मोबाईल कव्हरेजचे जाळे विणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल टॉवरची उभारणी सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०७ टॉवरवर बीएसएनएल तब्बल ३ लाख ६४ हजार मोबाईल ग्राहकांचा ताण सहन करीत आहे. दर महिन्याला ६ हजारांपेक्षा जास्त नवीन ग्राहकांची भर त्यात पडत आहे. आतापर्यंत सर्व १०७ टॉवरवरून २ जी इंटरनेट सेवा मिळत होती.आता त्या टॉवरवरून ३ जी सेवा देण्यास सुरूवात झाली आहे. सरकारने परवानगी दिल्यास ४-जी सेवाही सहज मिळू शकते, मात्र केंद्र सरकारने त्यासाठी परवानगी दिलेली नाही.८९ नवीन टॉवरची उभारणीएप्रिल २०१७ पासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मंजूर झालेल्या ८९ नवीन टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यापैकी १७ टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. त्यात गडचिरोली तालुक्यात ६, चामोर्शी तालुक्यात ३, कुरखेडा तालुक्यात ३, देसाईगंज तालुक्यात २, आरमोरी २ तर मुलचेरा तालुक्यात १ टॉवर उभारण्यात आला आहे.यासोबतच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) १०३ टॉवरच्या मागणीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. तो मान्य झाला आहे. मात्र निधीअभावी त्या टॉवरच्या उभारणीचे काम थांबले आहे. याशिवाय बीएसएनएलने आणखी २० टॉवरच्या मंजुरीचा प्रस्ताव नुकताच पाठविला आहे. या सर्व टॉॅवरनंतर किमान अर्धा जिल्हा मोबाईलच्या कव्हरेजमध्ये येईल.

टॅग्स :Mobileमोबाइल