शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी केली दिवस-रात्र एक

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका पार पडू शकल्या. हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिंग पार्ट्या पाठविण्याच्या कामासह मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणे व पोलिंग पार्ट्या परत आल्यानंतर ईव्हीएम संग्रहीत करून घेणे या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र राबली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. लोकसभा निवडणुकीतही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामासाठी लागून होती. नागरिकांकडून तसेच माध्यमांकडून येणाऱ्या सूचनांवरही त्यांनी तत्काळ दखल घेत आवश्यक ते बदल केलेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानाची वेळ २००९ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत चांगले मतदान व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जनजागृतीवर मोठा भर दिला. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा मतदानासाठी व्यापक जनजागृती मोहीम गावपातळीवर राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही चांगले मतदान होऊ शकले. देसाईगंज, गडचिरोली, अहेरी या तिनही ठिकाणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी गेल्या २०-२२ दिवसांपासून प्रचंड मेहनत घेऊन काम केले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीही वाढली.पोलीस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेला चांगली साथ देत दुर्गम गावातही मोठे मतदान व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. त्यामुळे चांगले मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ शकले. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाचे परिश्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)