शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरूद्ध आता अंतिम लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 21:42 IST

आता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात आहे, असे म्हणता येईल. हा वेग पाहता येत्या २०२२ पर्यंत या जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपायला पाहीजे, असा विश्वास गडचिरोली जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे२०२२ पर्यंत चळवळीचे अस्तित्व संपायला पाहिजे

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षात नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. गेल्या दोन वर्षात जवळपास ९० सशस्त्र नक्षलवादी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले, त्यांना अटक केल्या गेली, नाहीतर चकमकीत मारले गेले. त्यामुळे त्यांची संख्या बरीच घटली आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात आहे, असे म्हणता येईल. हा वेग पाहता येत्या २०२२ पर्यंत या जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपायला पाहीजे, असा विश्वास गडचिरोली जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.

बलकवडे यांची बदली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अंकित गोयल दोन दिवसात रूजू होणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोलीतील दोन वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आणि नक्षलविरोधी लढ्यात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी ‘लोकमत’शी मोकळेपणाने संवाद साधला.गेल्या दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस-नक्षल चकमकीत २० नक्षलवाद्यांना कंठस्रान घातले. ५३ जहाल नक्षलवाद्यांना अटक केली तर ४५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलवाद संपवण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे, आणि तो मिळवण्यासाठी त्यांचा विश्वास जिंकणे महत्वाचे आहे. पोलीस दलाने नागरी कृती कार्यक्रमातून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. रस्ते, पुलासारखे अनेक विषय पोलिसांच्या पुढाकारातून मार्गी लागले. कलम ११० अंतर्गत नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या नागरिकांवर होणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईला पोलिसी अत्याचाराचे स्वरूप देऊन हे कलमच हटवण्यासाठी नक्षलवादी ग्रामीण लोकांना भडकवत होते. त्यातून पोलीस आणि नागरिकांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही थेट कारवाई बंद केली. गावातील लोकांसोबत आधी बैठका घेऊन त्यांना समजावणे सुरू केले. नक्षलवाद्यांना मदत केल्याने काय नुकसान होते आणि पोलिसांना मदत केल्याने काय फायदा होतो हे प्रत्यक्ष दाखविले. त्यातून पोलिसांबद्दल चुकीचा प्रसार होणे बंद झाले. याशिवाय लोकांच्या मदतीसाठी वेळोवेळी पोलीसच धावून आल्याने लोकांचा विश्वास वाढत गेला.

गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव आहे. हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पात महिन्याकाठी हजारो लोक येतात. त्यांच्यासाठी योग्य सुविधा निर्माण करून जिल्हयातील वेगवेगळया पर्यटनस्थळांचा विकास केल्यास रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकते. जंगलाजवळील आदिवासी घरांमध्ये ‘होम स्टे’ची सुविधा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन, त्यांचे पारंपरिक नृत्य, आदिवासींच्या हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री अशा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींना चालना दिल्यास गडचिरोलीची मागास जिल्हा ही प्रतिमा बदलण्यास वेळ लागणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१०० टॉवर झाल्यास चित्र बदलेलगडचिरोली जिल्ह्यात अजून १०० मोबाईल टॉवरची गरज आहे. त्यासाठी आपण आतापर्यंत प्रयत्नरत होतो. या टॉवरमधून केवळ संपर्क सुविधाच नाही तर अनेक गोष्टींचा मार्ग कसा सुकर कसा होईल, याचे प्रेझेंटेशन मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यांनी तो प्रस्तावही मंजूर केला. पण त्यासाठी लागणारा निधी गृह विभागाने द्यावा, असे सूचवले. कोरोनाकाळामुळे सध्या निधीची अडचण असून हे काम आपल्या काळात झाले असते तर आणखी समाधान लाभले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

देशपातळीवर गडचिरोलीच्या कामाचे कौतुकशेजारच्या छत्तीसगड राज्यासह इतर काही राज्यांमध्ये नक्षल कारवाया जोमात असताना गडचिरोलीत घटत असलेली नक्षलवाद्यांची संख्या, त्यासाठी पोलीस विभागाकडून होत असलेले विविध प्रयत्न, नागरी कृती कार्यक्रमासंदर्भातील धोरण याचे कौतुक ‘आयबी’कडूनही देशपातळीवर झाले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे सादरीकरण करण्यासाठी बोलविले होते, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी