शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा याेजनेतून नुकसान भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:56 IST

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली ...

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील तब्बल १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची रक्कम संबंधित बँका तसेच तालुका कृषी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ३५ टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पैसेवारीच्या निकषानुसार संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे अधोरेखित करण्यात आले हाेते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कर्जदार शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यातून तर बिगर कर्जदारांना ऐच्छिक पद्धतीने पीक विमा काढण्यास भाग पाडण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही व स्थानिक तलाठ्यांमार्फत मोका चौकशी करून पीक नुकसानीचा अहवाल मागविण्यात येऊनही सदर शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यासह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

फाेटाे : तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी.