शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 11:06 IST

खासदारांना कानपिचक्या, स्वपक्षाला सूचक इशारा : गडचिरोलीत राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा

गडचिरोली : गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील ॲंटी इन्कम्बसीचा विचार करून महायुतीत जागा राष्ट्रवादीला सोडवून घ्या, अशी मागणी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.

मी ऑल पार्टी कँडिडेट आहे, अशा शब्दांत त्यांनी स्वपक्षाला सूचक इशारा देतानाच रेल्वे देसाईगंजच्या पुढे येईना, ती आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल, असे म्हणून त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या. शहरातील चंद्रपूर रोडवरील एका लॉन्समध्ये ७ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) निर्धार मेळाव्यात मंत्री आत्राम यांनी ही दर्पोक्ती केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, इतर मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, माजी आमदार हरिराम वरखडे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. सभापती, रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, रिंकू पापडकर आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, या जिल्ह्यात आदिवासी व ओबीसींची संख्या अधिक आहे. भगवान बिरसा मुंडा योजनेतून आदिवासींचा उत्कर्ष केला जात आहे. ओबीसींसाठी २५ हजार घरकुले देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गडचिरोली- चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घ्या, या मतदारसंघात राष्ट्रवादीला पोषक वातावरण असून काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार अशोक नेते यांचे नाव घेता ते म्हणाले, दिल्लीला जातात अन् परत येऊन आराम करतात. रेल्वे देसाईगंजच्या पुढे सरकत नाही. ती आणायची असेल तर मलाच दिल्लीला जावे लागेल. गडचिरोलीतील अहेरी व गोंदियातील आमगाव विधानसभा क्षेत्रावरही त्यांनी दावा सांगितला. हे दोन्ही मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सामान्यांचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठीच सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

नोंद घेतली, योग्य वेळी पक्षापुढे विषय मांडणार

यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या मागणीची नोंद घेतली असल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. धर्मरावबाबा हे विकासप्रिय नेतृत्व असून ते जे ठरवतात ते करून दाखवतात, असे ते म्हणाले. गडचिरोली- चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी योग्यवेळी पक्षापुढे विषय मांडतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरात लवकरच कार्यालय बांधणार

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शहरात लवकरच कार्यालय उभारणार असल्याचे सांगितले. रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांना त्यांनी जागा पाहा, असे जाहीर भाषणात सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांचा भाषणात आवर्जून उल्लेख केला. मी प्रदेशाध्यक्षपद सोडले अन् सत्ता गेली, आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष झालो व सत्ता आणली. तुम्ही मात्र जिल्हाध्यक्षपदी कायम आहात, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRupali Chakankarरुपाली चाकणकरGadchiroliगडचिरोलीAshok Neteअशोक नेते