शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूची लिलाव प्रक्रिया पारदर्शक करा

By admin | Updated: March 9, 2017 01:48 IST

पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार

मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन : स्वबळावर तेंदू संकलन करणाऱ्या ग्रामसभांचे होणार प्रबोधन गडचिरोली : पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहे. सन २०१७ च्या तेंदू हंगामात ९८१ ग्रामसभांनी स्वबळावर तेंदू संकलन व व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांनी आर्थिक शोषण टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्गदर्शनात निविदा व लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, असे आवाहन गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षात तेंदूपाने हंगामात तेंदू पानाचे उत्पादन कमी झाल्यामुळे बिडी व्यावसायिकांपुढे तेंदूपानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा तेंदूपानाला सर्वोत्तम भाव आहे. त्यामुळे अत्यंत कमी दर्जाचे बिगर पेसा क्षेत्रातील तेंदूपान घटकांचे तीन ते पाच पट किंमतीत विक्री झाली आहे. यावर्षी चांगला भाव असल्यामुळे काही तेंदू खरेदीदार ग्रामसभांना परस्पर संपर्क करून कमी भावात तेंदूपाने खरेदीचा व्यवहार करीत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून आले आहे. मागील वर्षात ग्रामसभांना तेंदू, बांबू विक्रीची व मजुरीची रक्कम पूर्णपणे मिळाली नसल्याने ग्रामसभांची ठेकेदारांनी फसवणूक केल्याची बाब चर्चेत आहे. ग्रामसभांची फसवणूक होत असल्याचे दिसून आल्याने वन विभाग व जिल्हा प्रशासनाने गंभीर चिंता व्यक्त केली असून यावर उपाययोजना म्हणून ग्रामसभांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामसभांनी तेंदू लिलाव व निविदा प्रक्रियेसाठी वृत्तपत्र व इतर माध्यमातून भरपूर प्रसिद्धी दिल्यास जास्तीत जास्त खरेदीदार सहभागी होऊन तेंदूपानाला भरघोस किंमत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. अशी राबवा तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया ग्रामसभांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण वनोपजाची विक्री पारदर्शक लिलाव प्रक्रियेतून करावी, ग्रामसभांनी त्यांच्या क्षेत्रात गोळा होणारे तेंदूपाने अंदाजीत (प्रमाण गोणी) ची संख्या नमूद करून प्रमुख दोन ते तीन वृत्तपत्र लिलाव निविदाबाबत जाहिरात करावी, उघडण्याचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांच्या अवधीचा ठेवावा, जाहिरातीमध्ये थोडक्यात विक्री, अटी व शर्ती नमूद कराव्या, पुरेसे खरेदीदार हजर झाल्यावरच प्रत्यक्ष जाहीर लिलाव प्रक्रिया करावी, मोजके दोन ते तीन खरेदीदार असल्यास लिलाव प्रक्रिया रद्द करून फेरलिलाव प्रक्रिया दुसऱ्यांदा घ्यावी, एका तालुक्यातील लिलाव प्रक्रियेचे काम तालुक्यातील सर्व गावांनी एकाच ठिकाणी व एकाच ठराविक दिवशी करावी.