शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 23, 2014 23:59 IST

जिल्हाभरात आतापर्यंत केवळ ५० टक्के धान पिकाची रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानही फारच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना

गडचिरोली : जिल्हाभरात आतापर्यंत केवळ ५० टक्के धान पिकाची रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानही फारच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्यशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.खासदार अशोक नेते यांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदा जिल्ह्यात तब्बल दीड महिना विलंबाने पाऊस बरसला. यामुळे पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या नष्ट झाल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर रोवणीच्या हंगामात सुद्धा निसर्गाचा लहरीपणा कायमच राहिला. त्यानंतर आलेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कशीबशी धान पिकाची रोवणी केली. मात्र पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात ५० टक्के रोवणी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक येण्याची शक्यता फारच कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावित, अशी मागणी नेते यांनी केली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. येथे कोणतेही उद्योगधंदे नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.