क्षतिग्रस्त घरांची लावली विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:39+5:30
आरमोरी येथील प्रभाग क्रमांक ५ मधील दोन ते तीन पिढ्यांपासून जुने असलेले उंच घर शनिवारी अतिवृष्टीमुळे पडले. या घरांमुळे शेजारील घराचे मोठे नुकसान झाले. येथे कुठलीही जीवितहानी होऊ नये, तसेच दुसऱ्या घराचे नुकसान होऊ नये म्हणून रविवारी नगर परिषदेने अर्धवट पडलेले घर जेसीबीच्या सहाय्याने पाडून मलब्याची विल्हेवाट लावली.

क्षतिग्रस्त घरांची लावली विल्हेवाट
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहरात शुक्रवार व शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरे कोसळली. त्यामुळे लगतच्या घरांनाही फटका बसून नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अर्धवट पडलेल्या घरांची व परिसरातील मलब्याची विल्हेवाट नगर पालिकेच्या वतीने लावण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अर्धवट पडलेली घरे पाडण्यात आली.
आरमोरी येथील प्रभाग क्रमांक ५ मधील दोन ते तीन पिढ्यांपासून जुने असलेले उंच घर शनिवारी अतिवृष्टीमुळे पडले. या घरांमुळे शेजारील घराचे मोठे नुकसान झाले. येथे कुठलीही जीवितहानी होऊ नये, तसेच दुसऱ्या घराचे नुकसान होऊ नये म्हणून रविवारी नगर परिषदेने अर्धवट पडलेले घर जेसीबीच्या सहाय्याने पाडून मलब्याची विल्हेवाट लावली. तसेच गुजरीजवळील आनंद बुद्ध विहारासमोर रस्त्यालगत अहमद शेख यांचे जुने कौलारू घर होते. या घराचा एक-एक भाग अतिवृष्टीमुळे शुक्रवारपासून कोसळत होता. शनिवारी हे घर अर्धे कोसळले. या घराला लागूनच शादीर अकबर शेख यांचे घर आहे. शादीर शेख यांच्या घराचेही नुकसान झाले. त्यामुळे जेसीबीद्वारे मलब्याची विल्हेवाट लावण्यात आली. शहरातील अन्य भागातही ही मोहीम राबवून जीवित व वित्तहानी टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे करण्यात आला.
ही मोहीम राबविताना नगर परिषदेचे उपाध्यक्ष हैैदर पंजवानी, सभापती सागर मने, भारत बावनथडे, विलास पारधी, नगरसेवक प्रशांत सोमकुंवर, श्रीनिवास आंबटवार यांनी पाहणी केली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मलब्याची विल्हेवाट लावण्यात आली. क्षतिग्रस्त तसेच जीर्ण झालेल्या घरांमध्ये नागरिकांनी वास्तव्य टाळावे, असे आवाहनही करण्यात आले.