शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळीला लक्ष्मी येऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:46 PM

संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही.

ठळक मुद्देदिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही. धानाचे पीक गेल्यावर्षीपेक्षा थोडे बरे आहे, पण धान किंवा कापसाचे एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. कधी सुरू करणार याचा थांगपत्ता नाही. अशा स्थितीत दिवाळीला खºया अर्थाने शेतकºयांच्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्हं नाही. तरीही कोणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी अस्वस्थ होताना दिसत नाही.खरीपातील हलका धान कापून मळणीला सुरूवात झाली आहे. मध्यम धानाची कापणी सुरू आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी पुढील आठ दिवसात मळणी होऊन धान विक्रीसाठी तयार केला जाईल. शासनाने हमीभाव जाहीर केले, पण खरेदी केंद्रच सुरू झाले नाही तर त्या भावाने धान घेणार कोण? शेवटी शेतकºयांना कमी भावाने आपला धान व्यापाºयांच्या घशात घालावा लागेल. उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाचा सत्ताधाºयांना विसर पडला असला तरी थोडीफार भाववाढ देऊन सरकारने शेतकºयांवर मेहरबानी केली आहे. पण या भावाचा फायदा व्यापाºयांऐवजी शेतकºयांना मिळण्यासाठी धान खरेदी केंद्र येत्या आठवडाभरात सुरू करणे गरजेचे आहे.आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाºया सहकारी संस्थांचे कमिशन दिले नसल्याने त्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आदिवासी विकास खातेही आहे. त्यांचा मतदार संघ आदिवासीबहुल आहे. त्यांनी हा विषय मार्गी लावून आपल्या संवेदनशिलतेचा परिचय देणे अपेक्षित आहे.ग्रामीण भागात अलिकडे सुरू करण्यात आलेले भारनियमनही शेतकºयांच्या जीवावर उठले. आधीच जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा नाहीत. ज्या काही मोजक्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पाणी महावितरण कंपनीने भारनियमन करून अडविणे सुरू केले होते. खासदार अशोक नेते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उर्जामंत्र्यांचे कान टोचल्यानंतर भारनियमनाचे वेळापत्रक बदलविले. कायम निसर्गाच्या कृपेवर विसंबून राहणाºया बळीराजाला प्रत्येक लोकप्रतिनिधीने किमान अशा कृतीतून तरी दिलासा देणे गरजेचे आहे.यावर्षी अपुºया पावसामुळे राज्याच्या बºयाच भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारी यंत्रणा सांगत असली तरी शेतकºयांना भरभरून उत्पन्न होईल अशी स्थिती अजिबात नाही. काही भागात तर परिस्थिती खूपच वाईट आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यात शेतकरी लगेच आत्महत्येचा मार्ग पत्करत नाही. म्हणून या शोषिक शेतकºयांचे शोषण होताना उघड्या डोळ्यांनी आपण पाहणेही योग्य नाही. शासन दरबारी सर्व लोकप्रतिनिधींनी जोर लावून या जिल्ह्यातल्या शेतकºयांनाही थोडाफार का होईना, शासकीय मदतीचा दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहीजे.दिवाळी साजरी करण्यासाठी कर्मचारी वर्गाला पगार, बोनस मिळतो. नेतेमंडळींची दहाही बोटं कायम तुपात असतात. मरण होते ते केवळ शेतकºयांचेच. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याही घराला लक्ष्मीची पावलं लागावी, शेतकºयांच्या नशिबी खूप भरभराट नसली तरी किमान गरजा भागवण्यासाठी कष्टाचा पैसा वेळीच त्यांच्या हाती पडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDiwaliदिवाळी