शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

एमआयडीसीत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत.

ठळक मुद्देआठ वर्षांपासून दुर्लक्ष : अहेरी उपविभागात बेरोजगारीची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथे शासनाने एमआयडीसी स्थापन केली. मात्र या ठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या नाही. त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. केवळ एमआयडीसीचा बोर्ड झळकत आहे.वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत. या सर्व बाबी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अहेरी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. मात्र हा केवळ सोपस्कार ठरला आहे. एमआयडीसी स्थापन होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला तरी शासनाने या ठिकाणी कोणत्याही सोयसुविधा निर्माण करून दिल्या नाहीत. सुविधा नसल्याने उद्योजकांनी सुध्दा पाठ फिरविली आहे. अहेरी येथील एमआयडीसी प्राणहिता नदीच्या तिरावर आहे. त्यामुळे येथील उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र इतर सुविधा नसल्याने उद्योजकांची अडचण झाली आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना शासन मात्र उद्योगांना चालना देण्याकडे व सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने येथील जनतेला केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहावे लागते. शेतीतून केवळ चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. उर्वरित कालावधीत मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्याऐवजी खालावत चालला आहे. तरूण वर्ग विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. अहेरी येथील एमआयडीसीत सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वनोद्योग उभारावेअहेरी उपविभागातील सर्वच तालुके जंगलाने व्यापले आहेत. जंगलातील लाकडाचा वन विभाग लिलाव करते. येथील लाकूड विविध राज्यांमध्ये पाठविला जाते. वनोपजाची सुध्दा अत्यंत कमी दराने विक्री केली जाते. वनोपज व लाकडावर आधारीत उद्योग स्थापन केल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी