कुनघाडा रै. व भाडभिडीतील ११ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:37+5:30

काही घरांच्या भिंती कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. तर काही घरे पूर्णपणे कोसळली आहेत. छत कोसळल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दैनंदन वापराच्या वस्तू व जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

Kunghoda rai And the collapse of 4 houses in rent | कुनघाडा रै. व भाडभिडीतील ११ घरांची पडझड

कुनघाडा रै. व भाडभिडीतील ११ घरांची पडझड

ठळक मुद्देसंडे अँकर । पंचनामे करून मदत देण्याची मागणी; कुटुंबांसमोर निर्माण झाला निवाऱ्याचा गंभीर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी मो. : तळोधी मोकासा परिसरातील नवेगाव रै. व भाडभिडी मो. येथील सुमारे ११ घरांची पडझड झाली आहे. ऐन पावसाळ्यात घरे कोसळल्याने सदर कुटुंबांसमोर निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवेगाव रै. येथील विकास तानुजी भुरसे, प्रकाश वासुदेव मुंगेलवार, नामदेव मारोती चापडे, आबाजी सखाराम चिचघरे, भाडभिडी मो. येथील भाऊराव सुखरू कुनघाडकर, नामदेव भिमा बंडावार, वसंत बालाजी कुनघाडकर, कालिदास मंगरू गेडाम, मानकूबाई लक्ष्मण नैताम, नामदेव पत्रू नैताम, निलकंठ चिरकुटा कुनघाडकर यांची घरे पडली आहेत. काही घरांच्या भिंती कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. तर काही घरे पूर्णपणे कोसळली आहेत. छत कोसळल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दैनंदन वापराच्या वस्तू व जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
तळोधी येथील मोरेश्वर भोयर, बाबुराव ठाकूर, केशव भोयर, नक्टू सातपुते, नक्टू शेरकी, प्रभाकर लिंगोनवार, रमेश चाटारे, लक्ष्मण आदे, भाऊजी भोयर यांच्या घरांचे नुकसान झाले. कच्चे घर असलेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल देण्याची योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक घर पक्के केले जाईल, असे आश्वासन केंद्र शासनाने दिले आहे. मात्र अजुनही ग्रामीण भागात ८० टक्क्याहून अधिक घरे कच्ची आहेत.

सोमनपल्लीवासीयांचे पुराने झाले हाल
सोमनपल्ली गावाला चार दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढले होते. तीन दिवस येथील महिला गावपाटलाच्या स्लॅबवर तर काही पुरूष झाडावर चढून होते. तिसºया दिवशी प्रशासनाची चमू पोहोचून गावकऱ्यांना बाहेर काढले. पुरामुळे कोट्यवधीच्या स्तावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने धानपीक कुजले आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.

पळसगावातही नुकसान
आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथील दिगांबर चहांदे यांचे घर व गुरांचा गोठा कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. घर कोसळले त्यावेळी सर्व जण झोपून होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जीवनाश्यक वस्तू व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. घर कोसळल्याने निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Kunghoda rai And the collapse of 4 houses in rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस