किर्तनातून दिला शेतीचा मंत्र

By Admin | Updated: September 6, 2014 23:48 IST2014-09-06T23:48:15+5:302014-09-06T23:48:15+5:30

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर

Kirtan gave agricultural spells | किर्तनातून दिला शेतीचा मंत्र

किर्तनातून दिला शेतीचा मंत्र

कृषी विज्ञान केंद्र : कृषी विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना दिली माहिती
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी एन. के. सोनटक्के यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर भडांगे, उदयराव बोरावार, पिक संरक्षणचे विषय विशेषज्ञ डॉ. सुधीर बोरकर, नानाजी वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना एम. के. सोनटक्के यांनी राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांने घेतला पाहिजे असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाविषयीदिली पाहिजे, जेणे करून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर वाढण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले.
डॉ. एस. पी. लांबे यांनी किर्तनकार व प्रवचनकार हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम करतात. त्यांच्या माध्यमातून कृषीचे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास फार मोठी मदत झाली आहे, असे मार्गदर्शन केले. चंद्रशेखर भडांगे यांनी मार्गदर्शन करतांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पिकांची योग्य वेळी लागवड करून त्यांची योग्य काळजी घेणे शक्य होत असल्याने शेती हा फायद्याचा उद्योग ठरण्यास मदत होईल. असे झाल्यास आजपर्यंत शेतीपासून दुर गेलेला युवक शेती करू लागेल. उत्तम शेती, मध्यम रोजगार व कनिष्ठ चाकरी ही म्हण सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन केले.
नानाजी वाढई यांनी संतांच्या ओव्या अभंगांमधून शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गृह विज्ञानच्या विषय विशेषज्ञ योगीता सानप तर आभार कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ एस. एस. कराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Kirtan gave agricultural spells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.