शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वैभव व इतिहासाची साक्ष देणाऱ्या वैरागड येथील किल्ल्याचे खास्तहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:00 AM

चंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

ठळक मुद्देगडप्रेेमींमध्ये नाराजी : डागडुजी न झाल्यास वास्तू नष्ट हाेण्याचा आहे धाेका

  प्रदीप बाेडणे लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्राचीन काळातील राज वैभवाची साक्ष देणारा वैरागड येथील किल्ला काळाच्या ओघात ढासळत चालला आहे. काही ठिकाणी तर केवळ अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची ही स्थिती बघून पर्यटन व अभ्यासासाठी आलेल्या गडप्रेमींना अश्रु अनावर हाेतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या वैरागड किल्ल्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे.  किल्ल्याचे चार बाजुचे बुरूज, तट, झाडाझुडुपांनी वेढले आहेत. शेकडाे वर्षांपासून उन, वारा, पाऊस झेलणाऱ्या तट व बुरूजांची कमालीची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची मागील पाच वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाकडून दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाची स्थिती चांगली आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागातील राजाचा महल, किल्ला परिसरात असलेली चाैकाेनी, पंचकाेनी, अष्टकाेनी व इतर विविध आकाराच्या विहीरी, भूयार व किल्ल्याबाहेर पडण्यासाठी असलेल्या मागच्या दरवाजाची पूर्णपणे पडझड झाली आहे. काही भिंती काेसळल्याने त्यांचे दगड अस्ताव्यस्त परसले आहेत. किल्ल्याची आत्ताची स्थिती बघून गडप्रेमींबराेबरच सामान्य माणसांचेही मन हेलावल्याशिवाय राहत नाही.

बल्हाळशहाचे हाेते राज्यचंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

०५ वर्षांपूर्वी झाली हाेती डागडुजी 

२०१५-१६ या वर्षात किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरूवात केली. जानेवारी २०२० पासून काम पूर्णपणे बंद पडले आहे. या कालावधीत मुख्य प्रवेशद्वाराची दुरूस्ती झाली. जुन्याप्रमाणेच किल्ला दिसावा, यासाठी जुने दगड व नवीन चुना वापरला आहे. 

वैरागड किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी खर्च केला जात आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. थांबलेले दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू हाेणार आहे.  के. आर. के. रेड्डी, पुरातत्व अधिकारी

भावी पिढीला जुने वैभव, इतिहास व  कलाकृतींची साक्ष  पटण्यासाठी किल्ला दुरूस्त हाेणे आवश्यक आहे. केवळ थातुरमातुर दुरूस्त करून ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करण्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे दिसून येते.दत्तात्रेय हर्षे, गडप्रेमी, वैरागड

टॅग्स :Fortगड