शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:11 IST

राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले

गडचिरोली : आज शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. दुसरीकडे युवा वर्ग रिकामा फिरताना दिसतो. शिक्षणाला श्रमाची जोड देणे गरजेचे आहे, पण आपल्या शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली, ही सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी शैक्षणिक धोरणावर आसूड ओढले.

गडचिरोलीत दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अभय बंग, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, तसेच रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. प्रमोद मुनघाटे आणि प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे मंचावर विराजमान होते. यावेळी राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले. शिक्षणाच्या व्यवस्थेलाच कॅन्सर झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. खेड्याला मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचे धोरण राबविले पाहिजे. केवळ अक्षराला ज्ञान समजून निरक्षर आदिवासींना ‘अडाणी’ समजण्याची चूक आपण करून बसलो असल्याचे ते म्हणाले.

पॅकेज महत्त्वाचे, माणुसकी कोण शिकवणार?

आज आपल्या मुलाला किती पॅकेज आहे हे वडील अभिमानाने सांगतात. मुलाला एटीएम मशीन बनविताना त्याला ‘माणूस’ बनायचे शिकवता का? असा परखड सवाल राजन गवस यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळात गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे शिक्षणमहर्षी होऊन गेले. आता मात्र शिक्षण सम्राट तयार होऊ लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Educationशिक्षणGadchiroliगडचिरोली