शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:11 IST

राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले

गडचिरोली : आज शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. दुसरीकडे युवा वर्ग रिकामा फिरताना दिसतो. शिक्षणाला श्रमाची जोड देणे गरजेचे आहे, पण आपल्या शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली, ही सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी शैक्षणिक धोरणावर आसूड ओढले.

गडचिरोलीत दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अभय बंग, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, तसेच रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. प्रमोद मुनघाटे आणि प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे मंचावर विराजमान होते. यावेळी राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले. शिक्षणाच्या व्यवस्थेलाच कॅन्सर झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. खेड्याला मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचे धोरण राबविले पाहिजे. केवळ अक्षराला ज्ञान समजून निरक्षर आदिवासींना ‘अडाणी’ समजण्याची चूक आपण करून बसलो असल्याचे ते म्हणाले.

पॅकेज महत्त्वाचे, माणुसकी कोण शिकवणार?

आज आपल्या मुलाला किती पॅकेज आहे हे वडील अभिमानाने सांगतात. मुलाला एटीएम मशीन बनविताना त्याला ‘माणूस’ बनायचे शिकवता का? असा परखड सवाल राजन गवस यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळात गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे शिक्षणमहर्षी होऊन गेले. आता मात्र शिक्षण सम्राट तयार होऊ लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Educationशिक्षणGadchiroliगडचिरोली