शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:11 IST

राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले

गडचिरोली : आज शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. दुसरीकडे युवा वर्ग रिकामा फिरताना दिसतो. शिक्षणाला श्रमाची जोड देणे गरजेचे आहे, पण आपल्या शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली, ही सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी शैक्षणिक धोरणावर आसूड ओढले.

गडचिरोलीत दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अभय बंग, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, तसेच रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. प्रमोद मुनघाटे आणि प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे मंचावर विराजमान होते. यावेळी राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले. शिक्षणाच्या व्यवस्थेलाच कॅन्सर झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. खेड्याला मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचे धोरण राबविले पाहिजे. केवळ अक्षराला ज्ञान समजून निरक्षर आदिवासींना ‘अडाणी’ समजण्याची चूक आपण करून बसलो असल्याचे ते म्हणाले.

पॅकेज महत्त्वाचे, माणुसकी कोण शिकवणार?

आज आपल्या मुलाला किती पॅकेज आहे हे वडील अभिमानाने सांगतात. मुलाला एटीएम मशीन बनविताना त्याला ‘माणूस’ बनायचे शिकवता का? असा परखड सवाल राजन गवस यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळात गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे शिक्षणमहर्षी होऊन गेले. आता मात्र शिक्षण सम्राट तयार होऊ लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Educationशिक्षणGadchiroliगडचिरोली