शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील रेती तस्करीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:48 IST

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले;

विजय वडेट्टीवार यांची तक्रार : पकडलेल्या वाहनांवर नाममात्र दंड आकारल्याचा आरोप गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले; मात्र त्यांच्यावर नाममात्र ७ लाख २ हजार रूपये दंड आकारून सदर वाहने सोडून देण्यात आली. यात कोट्यवधी रूपयांच्या रेतीची तस्करी केली जात आहे. याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे प्रधानसचिव यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा, नगरम, वडधम, अंकिसा, चिंतरेवला, मुपीगुड्डा या रेतीघाटांचा लिलाव ई-टेंडरींगद्वारे करण्यात आला. रेती तस्करांनी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून रेतीघाटाचा लिलाव विकत घेतला आहे. या रेतीघाटांच्या लिलावांमुळे रेती तस्करांना रानच मोकळे झाले आहे. अहेरीचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तरित्या २१ फेब्रुवारी रोजी ११.३० वाजताच्या सुमारास गोदावरी नदी पात्रातील वाळूघाटावर धाड टाकली. या धाडीत ट्रक व जेसीबीसह ६९ वाहने आढळून आली. यातील २७ वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याचे आढळून आले. फक्त वाळूने भरलेली ट्रक तहसील कार्यालयात जमा करून उर्वरित रिकामे ४२ ट्रक रेती घाटावरच ठेवण्यात आले. या गंभीर प्रकरणाची तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना केवळ वाळूने भरलेल्या २७ ट्रकवर ७ लाख २ हजार रूपयांचा दंड ठोठावला व ती वाहने सोडून देण्यात आली. या वाहनांवर किमान पाच कोटींच्या वर दंड ठोकणे आवश्यक होते. मात्र अत्यंत कमी दंड ठोकल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोदावरी नदी पात्रातून एका दिवसात १५० ते २०० ट्रक रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सिरोंचाचे तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली असता, रेती तस्कराच्या गुंडांनी नागरिकांना मारहाण केली आहे. प्रशासनाने नागरिकांवरच खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मद्दिकुंटा घाटावरही नागरिकांनी आंदोलन केले असता, गुंडांनी मारहाण केली. रेती कंत्राटदाराने आजपर्यंत अनेकवेळा वाळू लिलावाच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार वडेट्टीवार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)