शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

By संजय तिपाले | Updated: July 8, 2023 16:37 IST

गडचिरोलीत शासन आपल्या दारी: सामान्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेनेला साथ - अजित पवार

गडचिरोली : राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे सुशासन भाजप- शिवसेना सरकारने आणले. आता अजित पवार यांचीही साथ लाभली आहे. कर्तृत्ववान व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा राजकारणात अजित पवार यांच्यासारख्या घटना घडतात. मी देखील त्यातून गेलो आहे, ही लढाई आपण जिंकू, अजित पवार बोलत रहा, वस्तूस्थिती लोकांसमोर येऊ द्या.. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या बंडावर भाष्य केले.

येथील एमआयडीसी मैदानावर ८ जुलै रोजी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ सामान्यांना देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री  व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार सुधाकर आडबले, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, जिल्हाधिकारी संजय मीणा, उप महानिरीक्षक संदीप पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आदींची उपस्थिती हाेती. यावेळी विविध योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीवर सर्वांचे विशेष लक्ष असल्याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, भाजप- शिवसेना सरकारच्या युतीला वर्षपूर्ती झाली. आता अजित पवार सोबत आले आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन झाले असून आता ते आणखी वेगाने धावेल. वर्षभरात सरकारने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. सर्वसामान्यांचं हे सरकार असून कुठलाही वैयक्तिक अजेंडा न घेता लोकहिताचे निर्णय घेतले. गडचिरोलीत ११ लाखांपैकी सात लाख लोकांना विविध प्रमाणपत्रे, योजनांचा लाभ घरपोहोच देण्याचे काम केले. या माध्यमातून ६०१ कोटींच्या योजना सामान्यांना दिल्या आहेत. दुर्गम भागातील  लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

शंकर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज शासन आपल्या दारी योजनेतून दिलेल्या लाभानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ही सरकारच्या कामाची पावती आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजप व शिवसेना एकत्रित आली, आता अजित पवार सोबत आहेत. यानिमित्ताने त्रिशूल तयार झाले आहे. विकासासाठी या त्रिशुलाचा उपयोग होईल, पण सामान्यांच्या विरोधात कोणी काम करत असेल तर त्याला सोडणार नाहीत. शंकर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. कोनसरी येथे २० हजार कोटींची गुंतवणूक करुन नवा प्रकल्प   उभारत आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. मात्र,   लोहखनिजावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया झाली पाहिजे. विमानतळासाठी १४६ हेक्टर जागेची पाहणी केली आहे. दुर्गम भागात ५४४ मोबाइल टॉवर उभारले आहेत. ३१ हजार कुटुंबांना घरकुल दिले आहेत. आगामी काळात एकही आदिवासी कुटुंब बेघर नसेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले. 

त्यांना महत्त्व देऊ नका: अजित पवार

केंद्र रकार व राज्य सरकार एका विचाराचे असेल तर निधी व विविध विकास योजना आणता येतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांत देशात मोठ्या प्रमाणात कामे झाली. देश विकासात पुढे जात आहे, या विकासाला पाठिंबा द्यायला हवा म्हणून आपण भाजप व शिवसेनेसोबत आलो आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्याच्या व सामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

याबद्दल कोणी काही म्हणत असेल तर महत्त्व देऊ नका, असेही अजित पवार म्हणाले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत रहावे, अंतर पडू देऊ नका, एकीने कामे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.  

टॅग्स :PoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष