शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा ...

ठळक मुद्देकुलगुरू डॉ.कल्याणकर : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न समाजाची निर्मिती होते

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्याने झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जोपासला आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्याथी कुठेही मागे नाहीत. कलाकृती व अविष्कार त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरून आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आपला कलाविष्कार दाखवावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी केले.१७ वा आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते सोमवारी विद्यापीठाच्या प्रांगणात या महोत्सवाचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात झालेल्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, राजभवन निरिक्षण समितीचे डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ.एम. बी. पाटील, सदस्य डॉ.विजया पाटील, डॉ.ज्ञानोबा मुंडे, डॉ.वाणी लातुरकर, राजू हिवसे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी गोंडवाना विद्यापीठ हे भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या अवस्थेत असून अविकसीत आहे. त्यामुळे या विद्यापीठाला अजुनही हेल्पिंग हॅन्ड्सची गरज व्यक्त केली. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातूनच निर्माण झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाबद्दल माझ्यामध्ये पालकत्वाची भावना आहे. सदर विद्यापीठासाठी जे काही सहकार्य लागेल, ते आपण करू, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची आणि युवा महोत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. संचालन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका तथा महोत्सवाच्या संयोजिका डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यापीठांतर्गत अधिसभा, विद्वत, व्यवस्थापन परिषदेसह सर्व प्राधिकरणाचे सदस्य तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.पहिले कुलगुरू आर्इंचवार यांचा गौरवया महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.विजय आर्इंचवार यांचा कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी सर्व विद्यापीठांच्या चमुंच्या सांस्कृतिक रॅलीने कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.आज होणार या कलांचे सादरीकरणसोमवारी उद्घाटन सत्रानंतर दुपारी स्थळचित्र आणि लोकसंगीत वाद्य स्पर्धा झाल्या. मंगळवारी सकाळी ९.३० पासून सुगम संगीत (भारतीय), पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूहगान, चिकटकला (कोलाज) आणि एकांकिका स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धा वेगवेगळ्या ४ मंचांवर एकाचवेळी सुरू राहणार आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठ