वांगेपल्ली पुलावरून अवैध आवागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:01:10+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे.

वांगेपल्ली पुलावरून अवैध आवागमन
प्रतीक मुधोळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागेपल्ली : प्राणहिता नदीवर बांधण्यात आलेल्या वांगेपल्ली घाटावरून तेलंगणा राज्यातून नागरिकांची अवैध ये-जा सुरू आहे. यामुळे अहेरी तालुक्याला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा राज्याने पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र पुलाचे लोकार्पण झाले नसल्याने अधिकृतरित्या सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नाही. तेलंगणा व अहेरी तालुक्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार होत असल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची ये-जा सुरू राहते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी पथक नसल्याने आरोग्य तपासणी न होताच नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सीमेवरील प्रत्येक पुलावर पोलीस पथक तैनात केले आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाची चमूसुद्धा कार्यरत राहते. त्यामुळे अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करता येत नाही. परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र वांगेपल्ली पुलावरून अशी यंत्रणा नसल्याने नागरिकांची खुलेआम ये-जा सुरू आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पथकाची गरज
अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमणे आवश्यक आहे. पूर्वी नागरिक नदीमार्गे प्रवास करीत होते. मात्र आता नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने पुलावरून ये-जा करणे हा एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी पथक नेमल्यास अवैध प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.