शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

आदिवासी आरक्षणावर विचारमंथन

By admin | Updated: August 20, 2014 23:31 IST

जंगलात, डोंगरदऱ्यात, कड्याकपारीत राहणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला आरक्षण दिले आहे. आदिवासी बहुल गावातील प्रशासनात गती यावी,

धानोरा : जंगलात, डोंगरदऱ्यात, कड्याकपारीत राहणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला आरक्षण दिले आहे. आदिवासी बहुल गावातील प्रशासनात गती यावी, तसेच दुर्गम भागातील समस्या मार्गी लागाव्यात याकरिता राज्यपाल महोदयांनी ९ जून २०१४ रोजी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे आदिवासी बहुल भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे शासनाने पेसा कायदा रद्द करू नये, अशी मागणी उपस्थित आदिवासी समुदायानी केली.आदिवासी एकता समाज मंडळ व गोंडवाना गोंड महासभा जिल्हा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील चव्हेला येथील दंतेश्वरी मंदिरात सहविचार मेळावा बुधवारी घेण्यात आला. या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चिंतन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव गोटा होते. उद्घाटक म्हणून बावजी पाटील उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य सुधाकर नाईक, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, चंदू किरंगे, मनिरावण दुगा, बंडू किरंगे, हनुमंत नरोटे, बागराय उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते. जल, जंगल, जमीन यावर आदिवासींचा मालकी हक्क आहे. मात्र सध्या सदर मालकी हक्क हिरावून घेण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. राज्यपालाच्या अध्यादेशान्वये जिल्ह्यात लागू करण्यात आलेला पेसा कायदा रद्द केल्यास आदिवासी बांधवांचा हक्क हिरावल्या जाणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांचा विकास खुंटणार आहे. त्यामुळे पेसा कायदा रद्द केल्यास आदिवासी समूदाय कदापि सहन करणार नाही, असे रोखठोक विचार उपस्थित मान्यवरांनी या मेळाव्यात मांडले.या मेळाव्यात पेसा कायदा रद्द करू नये, तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये, असा ठरावही पारित करण्यात आला. याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा यांनी आदिवासी बांधवांना मौलीक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण सहारे यांनी केले तर आभार गावडे यांनी मानले. या मेळाव्याला चव्हेला परिसरातील आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)